" जेष्ठ पौर्णिमा " जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे . मंगलदायी ठरली आहे. या पौर्णिमेचे आपण महत्व जाणून घेतले पाहिजे . बौद्ध जगतात या पौर्णिमेला अनन्य साधरण महत्व आहे. सिद्धार्थ गौतमाला इ.स.पूर्व ५२८ ला वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती सम्यकसंबोधि प्राप्त होऊन तथागत सम्यक समबुद्ध होतात. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाची पुन्हा पुन्हा उजळणी करावी यासाठी चवथ्या आठवड्यात जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी रत्नघर या स्थळी राजायतन या झाडाखाली बसले असता ब्रम्ह देशाचे दोन (२) व्यापारी तपस्सू व भल्लिक हे तिथे आले आणि तथागत भगवान ज्या झाडाखाली बसले होते त्यांच्या जवळच्या दुसऱ्या झाडाखाली सावलीत भोजन करण्यासाठी बसले असता त्यांच्या मनात तथागत बुद्धांना भोजनदान देण्याची प्रेरणा झाली. आणि भगवान बुद्धां जवळ येऊन त्यांनी तथागतांना याचना केली . भन्ते , आम्ही आपणास भोजन म्हणून आणलेल्या गोड पदार्थाचा आपण स्वीकार करावा . आम्हांला समाधान वाटेल . भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र पुढे केले आणि त्यांच्या गोड पदार्थाचा स्वीकार केला . भोजन झाल्यावर तथागताने या व्यापाऱ्यांना आपला पहिला धम्म उपद...
ग्रंथालय विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून ग्रंथालय म्हणजे सर्व प्रकारची सर्वसाधारण पणे छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रीतपणे ठेवण्याची जागा. ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. ग्रंथालयातून ही साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादित कालावधीत परत केली जातात. शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय महत्त्वाचे व सक्तीचे असते. यामुळे संदर्भासहीत वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणे मिळण्याची सोय होते. बदलत्या काळात दृकश्राव्य माध्यमेही ग्रंथालयांमध्ये दिसून येतात. नवीन ग्रंथालयांचे स्वरूप हे संगणकीय ही असू शकते. आंतरजालाच्या उपलब्धतेमुळे गालावरून माहितीचा शोध शक्य होतो. तसेच योग्य ते सदस्यत्व घेऊन त्या त्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळावरही माहितीचा शोध घेता येतो. कमीतकमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञान साधनांचा वाढलेला आवाका प्रकाशनांची प्रचंड उपलब्धता माहितीतील वाढ ग्रंथालयाच्या आर्थिक समस्या इ.सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांना करावे लागत आहे. Options अनुक्रमणिका १ इत...
ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह आपण माहितीच्या युगात राहतो. प्रत्येक क्षणाला कोणत्याही बाबतीत निर्णय घेताना आपल्याला त्या त्या बाबींसंदर्भात पूर्ण माहिती हवी असते. माहिती युगाला तंत्रज्ञानाच्या प्रगतीची जोड मिळाल्यामुळे माहिती तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तंत्रज्ञानामुळे नवनवीन माहिती मिळविणे संघटन करणे साठवणे व जास्तीत जास्त अचूक माहिती एखादा निर्णय घेताना उपलब्ध करून घेणे शक्य झाले आहे. माहितीतज्ज्ञ अथवा ग्रंथपाल यांना माहितीचे विविध स्रोत शोधून काढून पुस्तके अथवा इतर छापील स्वरूपातील माहिती लोकहितार्थ सुनियोजितपणे संकलित करावी लागते. अशी उपयुक्त माहिती वाचनीय पुस्तके अथवा साहित्य पारंपरिक दस्तऐवज उदा. हस्तलिखिते पुस्तके पेपर्स विविध नियतकालिके, नकाशे त्याचप्रमाणे टेप्स रेकॉर्डस् ध्वनिमुद्रण सी. डी. इ.मध्ये उपलब्ध होते. कोणत्याही संस्थेच्या विकासासाठी व्यवस्थापन ही एक अत्यावश्यक बाब आहे. व्यवस्थापनाचा सर्वसामान्य अर्थ म्हणजे संस्थेच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी आवश्यक घटकांची विभागणी करून या विभागणीचे वितरण मनुष्यबळाचा स्तर वा...
Comments
Post a Comment