' संतशिरोमणी बाबांच्या तोंडून असे बोल बाहेर पडताक्षणीच बाबासाहेब मंचावरून खाली उतरले
आज वरळीत ज्या ठिकाणी कामगार राज्य विमा मंडळाचे 'कामगार हॉस्पिटल' उभे आहे. त्या मैदानाला पूर्वी 'काळे मैदान ' असे संबोधिले जात होते. त्या मैदानावर प.पु.बाबासाहेब आंबेडकरांची जाहीर सभा होती. काळ असेल १९५२-५३ चा, संपूर्ण मैदान लोकांनी फुलून गेले होते. रस्त्यावर देखील लोकांना उभे राहण्यास जागा नव्हती . दुपारपासूनच लोकांचे थवेच्या थवे हातात निळे झेंडे घेवून, बाबासाहेबांचा जयजयकार करीत मैदानात जमा झाले होते. सभा संध्याकाळी सुमारे पाच वाजता सुरु झाली. अनेक कार्यकर्त्यांची भाषणे झाली . शेकडो लोकांनी बाबासाहेबांना हार घातले. घोषणांच्या जयजयकारांत बाबासाहेबांचे भाषण सुरु झाले. प्रत्येक माणूस भारावल्याप्रमाण े जिथे जागा मिळेल तिथून अत्यंत शांतपणे बाबासाहेबांचा एक एक शब्द हृदयात कोरून ठेवत होता. एकूण एक माणूस बाबासाहेबांचे रुबाबदार सौंदर्य डोळ्यात साठवत होता. एकही माणूस जागचा हलत नव्हता . बाबासाहेब पण तल्लीन होऊन बोलत होते. इतक्यात स्टेजच्या उजव्या बाजूला, रस्त्याच्या कडेला काहीसा गोंधळ झाला. स्टेजच्या उजव्या बाजूची माणसे पटापट उभी राहिली .बाबासाहेबांनी सर्वांनी ब