परीक्षा नियंत्रकांना हटवा! पुणे। दि. ५ (प्रतिनिधी) परीक्षा विभागातील सर्व प्रकारच्या गोंधळाला परीक्षा नियंत्रकच जबाबदार आहेत, असा थेट आरोप करीत पुणे विद्यापीठातील कर्मचार्यांनी 'परीक्षा नियंत्रकांना हटवा' अशी मागणी केली आहे. परीक्षा नियंत्रकांच्या विरोधात कर्मचार्यांनीच जोरदार मोहीम उघडली असून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना त्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समिती स्थापन केली असून, परीक्षा नियंत्रकांनी १0 दिवसांच्या आत पदभार सोडला नाही तर त्याच्या निषेधार्थ विद्यापीठ बंद केले जाईल, असा इशारा समितीने दिला आहे. त्यामुळे आता कुलगुरू यावर काय निर्णय घेतात याकडे सार्यांचेच लक्ष लागलेले आहे. ऑनलाईन प्रवेशातील समस्या, परीक्षा प्रवेशपत्रावर येणारे चुकीचे विषय, निकालातील गोंधळ, उत्तीर्णांना अनुत्तीर्ण करणे, हजर असताना गैरहजर दाखवणे, निकाल वेळेवर न लागणे, या सार्या गोष्टींना परीक्षा नियंत्रकच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ऑक्टोबर २0१२ पासून परीक्षा विभागाचे कामकाज ऑनलाई