परीक्षा नियंत्रकांना हटवा!
परीक्षा नियंत्रकांना हटवा!
| ||
पुणे। दि. ५ (प्रतिनिधी)
| ||
परीक्षा विभागातील सर्व प्रकारच्या गोंधळाला परीक्षा नियंत्रकच जबाबदार आहेत, असा थेट आरोप करीत पुणे विद्यापीठातील कर्मचार्यांनी 'परीक्षा नियंत्रकांना हटवा' अशी मागणी केली आहे. परीक्षा नियंत्रकांच्या विरोधात कर्मचार्यांनीच जोरदार मोहीम उघडली असून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना त्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समिती स्थापन केली असून, परीक्षा नियंत्रकांनी १0 दिवसांच्या आत पदभार सोडला नाही तर त्याच्या निषेधार्थ विद्यापीठ बंद केले जाईल, असा इशारा समितीने दिला आहे. त्यामुळे आता कुलगुरू यावर काय निर्णय घेतात याकडे सार्यांचेच लक्ष लागलेले आहे. ऑनलाईन प्रवेशातील समस्या, परीक्षा प्रवेशपत्रावर येणारे चुकीचे विषय, निकालातील गोंधळ, उत्तीर्णांना अनुत्तीर्ण करणे, हजर असताना गैरहजर दाखवणे, निकाल वेळेवर न लागणे, या सार्या गोष्टींना परीक्षा नियंत्रकच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ऑक्टोबर २0१२ पासून परीक्षा विभागाचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले आहे. ते काम बाहेरील कंपनीला देऊन त्यासाठी लाखो रुपये दिलेले आहेत. परंतु सुरुवातीपासूनच या पद्धतीत अनेक त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. त्याचा त्रास परीक्षा विभाग, महाविद्यालये व विद्यार्थ्यांना होत आहे. परीक्षा विभागात कोणतीही सुधारणा करायची तर तेथील अधिकारी व कर्मचारी यांची मते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. परंतु तसे न होता या विभागात एककलमी योजनाच राबवली जात आहे. परीक्षा नियंत्रकांना परीक्षा विभागाचे कामकाज सांभाळणे आवाक्याबाहेरचे दिसत आहे, त्यामुळे त्यांनी पदभार सोडावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, परीक्षा विभागातील कर्मचार्यांच्या हेतुपुरस्सर बदल्या केल्याने त्यांच्यातही असंतोषाचे वातावरण आहे. विद्यापीठाची प्रतिमा सुधारायला हवी परीक्षा विभागाची इतकी बदनामी या पूर्वी कधीही झाली नव्हती. परीक्षा विभागाचे काम हे 'टीम वर्क' असते व ते त्या पद्धतीनेच व्हायला हवे. या ठिकाणी कर्मचार्यांशी सुसंवाद नाही. तुम्हाला कामच नाही, सारे ऑनलाईन आहे अशी उत्तरे देऊन गप्प बसवले जाते. ऑटोमेशनच्या नावाखाली चुका झाकायच्या व खोट्या आश्वासनांवर परीक्षा विभाग चालवायचा असे चालणार नाही. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मिळूनच विद्यापीठाची प्रतिमा सुधारायला हवी, असे मत संघटनेचे अध्यक्ष यशवंत कुलकर्णी (ब्रrो) व सचिव बाळासाहेब चौरे यांनी व्यक्त केले आहे. |
Comments
Post a Comment