आयुष्यभर डॉ.बाबासाहेबांना तीन गोष्टी जीवापाड प्रिय होत्या !!
आयुष्यभर डॉ.बाबासाहेबांना तीन गोष्टी जीवापाड प्रिय होत्या !! आयुष्यभर डॉ.बाबासाहेबांना तीन गोष्टी जीवापाड प्रिय होत्या... त्यांचे पददलित बांधव, ग्रंथ आणि हा महान देश. त्यांना ज्ञानाची तृष्णा किती मोठी होती याचे वर्णन करण्यापेक्षा फक्त कल्पनाच करता येईल. कधी कधी तर ते खोलीच्या बाहेर पडत नसत की सूर्यप्रकाशही बघत नसत. अशा वेळी ते जिथे असतील तेथेच म्हणजेच अभ्यासिकेत, शयनकक्षात किंवा त्यांच्या ग्रंथसंग्रहालया त त्यांना चहा, कॉफी बिस्किटे दुपारचे किंवा सायंकाळचे भोजन त्यांना देवून न्यावे लागत असे. काही वेळा कोणी त्यांना भेटायला आल्याचे आणि वाट पहात असल्याचे सांगितले तर ते बाहेर येत असत, कोण आले आहे ते बघत. त्याचे अभिवादन स्वीकारत आणि एकही शब्द न बोलता जागच्या जागी येवून बसत आणि अभ्यासात हरवून जात असत. भेटीला येणाऱ्यांना संकोचल्यासारखे व्हायचे, पण मनातल्या मनात सर्वांना हे पटत होते की त्यांचे एकाग्र चित्त आणि सखोल चिंतन यात व्यत्यय आणणे हे पाप आहे. कुठल्याही प्रकारे कुरबुर न करता 'बाबासाहेब जिंदाबाद' अशी घोषणा देत ते निघून जात असत. विचार संदर्भ- पुस्तकं 'काही आठवणी'