भारतीय समाजव्यवस्था

भारतीय समाजव्यवस्था जाती-उपजातींनी पोखरल्या गेली आहे.
सर्वाँची जातीसाठी माती खाण्याची मानसिकता असल्याने मरण, जेवण, विवाह या गोष्टी जातीनिष्ठ होऊन जातात. यातून रोटीबंदी, बेटीबंदी अशा चूकीच्या अटी पाळण्यात येतात. जातीबाह्य चांगल्या प्रथांचा विचार करणेही पाप समजले जाते. सर्वांना घेऊन चालणारा, जातीभेद न पाळणारा येथे जातीभ्रष्ट ठरतो. कारण जातीच जातीच्या वैरी असतात. अशा वैमनस्यातून परस्पर गैरसमज वाढतात. यातूनच परकीय राजा चालतो पण स्वदेशी राजा नाकारल्या जातो. यामुळे समाज सतत दुभंगल्या जातो. त्यांच्यात कधीच एकजूट निर्माण होत नाही. या जातीभेदाचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे स्वराज्य, स्वातंत्र्य याविषयी आस्था, कळकळ कुणालाच वाटत नाही. कारण स्वराज्यात दुस-या जातीच्या हातात सत्ता गेल्यास आपल्या जातीचे काय होईल, ही चिंता वाटते, जातीद्वेषाला खतपाणी मिळते आणि द्वेषभावना पिढ्यान् पिढ्या सुरु राहते..
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
Thank u- Sumedh Nagarale
Like ·  ·  · 88419

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह