महार बटालियन !!
महार बटालियन !!
कश्मिरच्या सीमेवर आमच्या दुसऱ्या महार बटालियनने शौर्य व धैर्याचा जो अपूर्व लढा दिला, तो पाहून सारे सैनिक अधिकारी दंग झाले. कुणी सांगावे आमची हि बटालियन काश्मिर सीमेवर लढली नसती तर संपूर्ण काश्मिर , पाकिस्तानच्या घशात गेले नसते का ? आमच्या बटालियनने दाखविलेली वीरश्री पाहून बाबासाहेब गहिवरले.
सन १९४९ मध्ये बाबा या बटालियनला दर्शन देण्यास काश्मिरला गेले . बाबा मिलटरी प्रांगणात आले. साऱ्या सैनिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा नाचत होती. बाबांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा त्यांना अवश्य लाभ घडला होता.
बाबांनी आपली प्रेमळ नजर चोहीकडे फिरविली . प्रत्येक सैनिक गडी आदराने नतमस्तक होऊन उभा होता. त्याच क्षणी बाबांच्या टपोऱ्या डोळ्यात आसवे तरळली . एका क्षणात तिथे गंभीरता निर्माण झाली. एक जवान बुटांचा खटखट आवाज करीत बाबांकडे आला आणि म्हणाला , " बाबा ! काय झालं ते तात्काळ सांगा . आम्ही तुमच्याकरिता रक्ताचे पाट...."
परंतु त्या सैनिकाचे बोलणे संपण्यापूर्वीच बाबा म्हणाले , " तसं काही नव्हे रे ! त्याच असं आहे ."
काही वर्षापूर्वी म्हणजे भारताला स्वातंत्र मिळण्यापूर्वी इंग्रजांनी फायोनियार कोर्सकरिता ( हलक्या दर्जाची कामे जशी रस्ते बनविणे . रस्त्यावर दगडांची भर टाकणे , पूल बनविणे इत्यादी ) आपली माणसे देण्याबद्दल मला लिहिले होते.
मी त्यांना खडसावून सांगितले कि, " माझी माणसं शूरवीर आहेत. शत्रू सैन्याशी दोन हात करण्यास अन्य जमातीपेक्षा त्यांच्यात अधिक दम आहे. तुम्ही माझ्या लेकरांना दोन हात करण्याची संधी देऊन पहा ."
इंग्रजांनी माझी शिफारीस पाहून कामठी मध्ये पहिली महार बटालियनची स्थापना केली. त्यानंतर सुमारे दोन वर्षानंतर दुसरी बटालियन स्थापन करण्यात आली. तुम्ही लोकांनी माझे शब्द खरे करून दाखविले , हे पाहून मला अत्यानंद होत आहे. माझ्या डोळ्यात तरळणारी आसवे समाधानाची व आनंदाची आहेत.
बाबासाहेबांचे हे शब्द ऐकून सारेच गहिवरले ..
लेखं- सविता राजेंद्र बाविस्कर ताई. Savita Baviskar https://www.facebook.com/
Comments
Post a Comment