बाबासाहेब
१९५५ च्या जूनपासून बाबासाहेबांचा आहार कमी कमी होत चालला होता. चार -पाच महिन्यांनी तर ते एक चपाती व थोडा भात अशा अल्प आहारावर आले. ते न्याहारीला एखादे फळ व चहा घेत.
जेवण सकाळी ११-१२ च्या दरम्यान घेत . रात्रीचे जेवण ७-८ च्या सुमारास होत असे . ते वाचनात व लिखाणात गर्क झाले, तर जेवण न घेता फक्त ताक,चहा व ब्रेडचा एखादा स्लाईस घेत असत. त्यांचा आहार वाढला पाहिजे , म्हणून त्यांचे डॉक्टर मालवणकर यांनी असे ठरविले कि , युरोपियन पद्धतीचे जेवण तयार केले तर बाबासाहेब आवडीने खातील व त्यायोगे आहार वाढेल . तेव्हा त्यांनी एक गोवाणी बट्लर व खानसामा यांना कामावर ठेवले. बाबासाहेबांना ते युरोपियन पद्धतीचे जेवण अजिबात आवडत नसे पण ते त्यांनी सात-आठ दिवस गुपचूप खाल्ले . नंतर कंटाळून त्यांनी बाजरीची भाकरी अगर चपती, वरणभात , भाजी व मटणसूप हेच जेवण पंसंत केले. गोवाणी बट्लर व खानसामा यांना दोन आठवड्यांनी नोकरीवरून कमी केले .
जेवण सकाळी ११-१२ च्या दरम्यान घेत . रात्रीचे जेवण ७-८ च्या सुमारास होत असे . ते वाचनात व लिखाणात गर्क झाले, तर जेवण न घेता फक्त ताक,चहा व ब्रेडचा एखादा स्लाईस घेत असत. त्यांचा आहार वाढला पाहिजे , म्हणून त्यांचे डॉक्टर मालवणकर यांनी असे ठरविले कि , युरोपियन पद्धतीचे जेवण तयार केले तर बाबासाहेब आवडीने खातील व त्यायोगे आहार वाढेल . तेव्हा त्यांनी एक गोवाणी बट्लर व खानसामा यांना कामावर ठेवले. बाबासाहेबांना ते युरोपियन पद्धतीचे जेवण अजिबात आवडत नसे पण ते त्यांनी सात-आठ दिवस गुपचूप खाल्ले . नंतर कंटाळून त्यांनी बाजरीची भाकरी अगर चपती, वरणभात , भाजी व मटणसूप हेच जेवण पंसंत केले. गोवाणी बट्लर व खानसामा यांना दोन आठवड्यांनी नोकरीवरून कमी केले .
कमी आहार होत गेल्यामुळे बाबासाहेबांना अशक्तपणा फार जाणवू लागला .अंघोळीला वैगैरे जातांनाहि त्यांना काठीचा आधार लागू लागला . ते लटपटत ,कापत व थरथरत पावले टाकू लागले. नानकचंद वा इतर कोणी जवळ असेल तर त्यांच्या खांद्यावर हात ठेवून न्हाणीघरापर्यंत जाऊ लागले . कधीकधी दुसऱ्यांच्या साहाय्याशिवाय त्यांना अंघोळहि करणे शक्य होत नसे .
घरी असतांना ते लुंगी,धोतर,किंवा पायजमा व अंगात बंगाली कुडता असे वापरत असत .आणि आपले लेखन वाचन करीत असत .कधीकधी ते बिछान्यात पडून वाचन करीत .अशा वेळी बिछान्याच्या दोन्ही बाजूंना लहान स्टुलावर पुस्तकांचा ढीग ठेवलेला असे. थंडीच्या वेळी ते अंगात स्वेटर घालीत आणि गळ्याला स्कार्फ गुंडाळीत असत. फार थंडीत ते डोक्यालाही स्कार्फ गुंडाळीत . अशा स्थितीत ते एकदा लिहित बसले असता त्यांच्या डोकीचा स्कार्फ सैल होऊन त्याची दोन टोके कानांच्या दोन्ही बाजुंवरून खाली लोंबू लागली . हे पाहून जवळच असलेल्या नानाकचंदाला गंमत वाटली व त्याने एक आरसा बाबासाहेबांच्या समोर धरला . " हे काय ,काय करतोस ?" असे ते रागाने म्हणेस्तोवर स्वतःच्या प्रतिबिंबाकडे त्यांचे लक्ष गेले तेव्हा ते मोठ्याने हसून म्हणाले,
" मी कसा राजघराण्यातील अरब राजपुत्रासारखा दिसतो कि नाही ! " दोघेही मनमुराद हसले.
निरनिराळ्या पोशाखात आपण कसे राहिलो व हे सर्व पेहराव आपणास कसे खुलून दिसत असत, याबद्दलच्या गेल्या तीस-चाळीस वर्षातील अनेक आठवणी नानाकचंदास त्यांनी सांगितल्या
" मी कसा राजघराण्यातील अरब राजपुत्रासारखा दिसतो कि नाही ! " दोघेही मनमुराद हसले.
निरनिराळ्या पोशाखात आपण कसे राहिलो व हे सर्व पेहराव आपणास कसे खुलून दिसत असत, याबद्दलच्या गेल्या तीस-चाळीस वर्षातील अनेक आठवणी नानाकचंदास त्यांनी सांगितल्या
१९४६ -४७ च्या पूर्वी जोर,दंड , बैठका ,नमस्कार ,आसने , फिरणे वैगैरे मार्गांनी व्यायाम घेत असत
आणि चांगला आहारही घेत असत. पण त्यानंतरच्या काळात त्यांची प्रकृती खंगत गेली . त्यामुळे जड व्यायाम ते करीत नसत . अधूनमधून दिल्लीच्या आपल्या ठिकाणापासून ५-७ मैल दूरवर जाऊन बसत असत. अशा वेळी त्यांच्याबरोबर कोणीतरी समाजसेवक अगर कार्यकर्ते असत. नानाकचंद बहुदा बरोबर असत. गाझियाबाद, अलीपूर ( खेड ) , रोहटककडे जाणारा रस्ता , दिल्ली
युनिव्हर्सिटी लाॅन , वैगैरे ठिकाणी बाबासाहेब एक-दोन तास बसत असत. कधीकधी रीडिंग रोडवरील बुद्धविहारामध्ये ते जात आणि अर्धा तास ध्यानमग्न बसून व नंतर वंदना करून परत घरी येत . गाझियाबादच्या बाजूला हिदोन नदीच्या काठच्या एका विवक्षित ठिकाणी बसणे त्यांना फार आवडे . या ठिकाणी ते आपल्या लहानपणाच्या आठवणी सांगत. विद्याभ्यासासाठी उपाशी राहण्याची आपणावर अनेक वेळा प्रसंग आले , आपले व आपल्याबरोबर रमाबाईंचे व मुलांचे फार हाल झाले , रमाबाईने फार कष्ट सोसले, तिला आपण सुखी करू शकलो नाही , असे गहिवरून सांगत असत. सध्याच्या वैवाहिक जीवनात आपणाला जे सुख मिळते त्या दुःखाचाच भाग मोठा आहे असेही ते म्हणत .
आणि चांगला आहारही घेत असत. पण त्यानंतरच्या काळात त्यांची प्रकृती खंगत गेली . त्यामुळे जड व्यायाम ते करीत नसत . अधूनमधून दिल्लीच्या आपल्या ठिकाणापासून ५-७ मैल दूरवर जाऊन बसत असत. अशा वेळी त्यांच्याबरोबर कोणीतरी समाजसेवक अगर कार्यकर्ते असत. नानाकचंद बहुदा बरोबर असत. गाझियाबाद, अलीपूर ( खेड ) , रोहटककडे जाणारा रस्ता , दिल्ली
युनिव्हर्सिटी लाॅन , वैगैरे ठिकाणी बाबासाहेब एक-दोन तास बसत असत. कधीकधी रीडिंग रोडवरील बुद्धविहारामध्ये ते जात आणि अर्धा तास ध्यानमग्न बसून व नंतर वंदना करून परत घरी येत . गाझियाबादच्या बाजूला हिदोन नदीच्या काठच्या एका विवक्षित ठिकाणी बसणे त्यांना फार आवडे . या ठिकाणी ते आपल्या लहानपणाच्या आठवणी सांगत. विद्याभ्यासासाठी उपाशी राहण्याची आपणावर अनेक वेळा प्रसंग आले , आपले व आपल्याबरोबर रमाबाईंचे व मुलांचे फार हाल झाले , रमाबाईने फार कष्ट सोसले, तिला आपण सुखी करू शकलो नाही , असे गहिवरून सांगत असत. सध्याच्या वैवाहिक जीवनात आपणाला जे सुख मिळते त्या दुःखाचाच भाग मोठा आहे असेही ते म्हणत .
! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!
Comments
Post a Comment