डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : (भीमगर्जने नंतरचे वादळ)


डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २७ (भीमगर्जने नंतरचे वादळ)


जातपात तोडक मंडळाचे वार्षिक संमेलन (१९३६)
जातपत तोडक नावाची नावाची त्या काळातील पुरोगामी लोकांची एक अत्यंत प्रसिद्ध संघटना होती. जातियवादाच्या विरोधात पुरोगामी म्हणवून घेणा-या हिंदु बांधवांची ही जातीयवाद्यांच्या विरोधात काम करणारी संघटना. पण या संघटनेची कार्यपद्धती मात्र सनातन वाद्याना न दुखविता जातीयवादाचे निर्मूलन करणारी होती. जातीयवाचाव्या विरोधात मोठी भरीव कामगीरी करणारी ही संस्था सनातनी लोकांचा कर्दनकाळ बनून फिरत असे. बाबासाहेबांसारख्या अस्पृश्य उद्धारकाच्या उदयानी ही संस्था अत्यंत भारावून गेली. १९३६ मध्ये लाहोर येथे भरणा-या जातपात तोडक मंडळाच्या वार्षिक संमेलनाचे अध्यक्षपद बाबासाहेबानी भुषवावे असा ठराव या मंडळाद्वारे पास करण्यात आला. तदनंतर बाबासाहेबानी अध्यक्षपद स्विकारावे अशी आग्रहाची विनंती केली.  श्री. इंद्रसिंग नावाचा यांचा एक कार्यकर्ता या संदर्भात मुंबईत येऊन बाबासाहेबांची भेट घेतो.  तसेच डॉ. गोकुळचंद नारंग नावाच्या धनाढ्य व्यक्तीने संमेलन काळात बाबासाहेबानी आपल्याकडे राहावे अशी विनंतीही केली. या परिषदेसाठी बाबासाहेबानी अध्यक्षिय भाषण करावयाचे होते. त्यासाठी त्यानी अत्यंत विद्वत्तेने एक प्रदिर्श भाषण तयार केले. बाबासाहेबांच्या भाषणाची तय्यारी ही उभ्या भारताला गदागदा हालवून सोडणारी होती. जातीयवाद्यांच्या अंध नि वर्चस्ववादी मनोवृत्तीला भगदाड पाडणारी होती.
 ईकडे मुंबई ईलाख्यात बाबासाहेबांची भीमरुपी गदा हिंदुत्ववांद्यांवर घणाघाती हल्ले चढविण्यात मश्गूल झालेली होती. बाबासाहेबानी उगड उघड घेतलेली हिंदु विरोधी भूमीका  जातपात तोडक वाल्याना फारसी आवडली नाही.  त्यामूळे त्यांच्यात बाबासाहेबांच्या अध्यक्षीय पदापद्धल अंतर्गत वादावादी चालू झाली.  शेवटी १९३६ च्या मार महिन्यात असे घोषित करण्यात आले की मंडळाचे वार्ष संमेलन मे महिन्या पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.  ९ एप्रिल १९३६ रोजी संताराम हरभगवान नावाचा मंडळाचा एक सदस्य मुंबईत येऊन बाबासाहेबांची भेट घेतो.  बाबासाहेबांच्या हिंदू विरोधी भीम गर्जनेनी लाहोरचे जातपात तोडक मंडळांच्या सदस्यात उडालेले खटके व काही व काही दुखावलेले वरिष्ठ सदस्य मंडलाचा राजिनामा दिल्याची बातमी घानावर घातली. तरी सुद्धा मंडळ बाबासाहेबानाच अध्यक्ष म्हणून संमेलनास बोलविण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचेही मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले. त्याच बरोबर अध्यक्षीय भाषणासाठी बाबासाहेबानी लिहलेल्या भाषणाचा काही भाग छापण्यासाठी म्हणून या सदस्याने सोबत घेतला.  ईकडे बाबासाहेबांची भीमरुपी गदा मात्र काही केल्या थांबेना. सनातन वाद्यांवर भीमास्त्राचा मारा सतत चालू होता.  त्याच बरोबर धर्मांतराची घोषणा झाल्यापासून हिंदू समाजात  सर्वत्र एक हाहाकार उडाला होता.  चहू बाजूनी बाबासाहेबांवर टिका, शाप नि दुषणांचा भडीमार होऊ लागला. प्रतिउत्तरात लढ्यात बाबासाहेबही मोठ्या विर्याने उत्तर देत, विद्वानाच्या बैठकीतला हा महामानव या सर्वांवर भीमास्त्र सोडून सनातन्याना घायाळ करी.  हिंदू धर्मावरील अत्यंत टोकाची टीका, धर्मग्रंथाना लावलेल्या तत्वज्ञानाच्या कसोट्या  व वेद, स्मृती नि श्रृतींचा तर्कबुद्धिने घेतलेला समाचार ईतका मनोवेधक आणि मर्मभेदक असे की बाबासाहेबांपुढे हिंदीचे लढवय्ये नांगी टाकून पळ काढीत.  पण याची दुसरी बाजू होती की, हिंदूंच्या मनातील द्वेष वृद्धिंगत  होत गेला.  बाबासाहेबांचे विरोधक वाढत गेले.  याचा एकंदरीत परिणाम असा झाला की, जातपात तोडक मंडळासारखी  स्वत:ला  पुरोगामी  समजणारी संस्था बाबासाहेबाना अध्यक्ष बनविण्यात धोका मानू लागली. शेवटी बाबासाहेबांच्या हिंदू विरोधी लढ्याचा परिणामी धसका घेऊन पुरोगाम्याचं सोंग आणणारी ही जातपात तोडक मंडळ नावाची संघटना लाहोर येथे भरणारे वार्षीक संमेलन कायमचे स्थगीत करते. अशा प्रकारे बाबासाहेबांचे अध्यक्षीय भाषण निकाली काढले. या संमेलनासाठी लिहून घेतलेले प्रदिर्घ भाषण तय्यार होते. परिषद रद्द झाल्यामूळे या भाषणाची एक लहानशी पुस्तीका छापून घेण्याचे ठरले.जातीचे निर्मूलन (अनायलेशन ऑफ कास्ट) नावाची पुस्तीका इंग्रजीत छापण्यात आली. लवकरच या पुस्तीकेचे जवळपास सात आठ भाषेत भाषांतर करण्यात आले. आणि या लहानशा पुस्तीकेने त्या काळात भारतभर खडबड उडवून दिली. हिंदू धर्माचे वाभाडे काढणारी ही पुस्तीका हिंदू धर्मग्रंथाचा समाचार घेणारी तर्क व तत्वाच्या कसोट्या लावून धर्मग्रंथाचा धुव्वा उडविणारी आहे.

शीख धर्माची चाचपणी
१३ व १४ एप्रिल १९३६ रोजी अमृतसर येथे शीख मिशनरी परिषद भरली होती. देशाच्या कानाकोप-यातून अस्पृश्य वर्गाचे लोक या परिषदेस हजर झाले.  बाबासाहेबही आपल्या अत्यंत मोजक्या कार्यकर्त्यांसकट ईथे हजेरी लावतात. सेवानिवृत्त न्यायाधिश सरदार बहाद्दुर हुकूमसिंग हे या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेत केरळचे अस्पृश्य समाजाचे नेते डॉ. कुदीर व ईतर अनेक मंडळीनी मोठ्या अभिमानानी शीख धर्माचा जाहीर नि विधीवत स्विकार केला.  या परिषदेत बाबासाहेबांचे एक तेजस्वी भाषण झाले. बाबासाहेब ईथे शीखांच्या भूमीत बोलताना मोठ्या त्वेषाने भीम गदा फिरवीतात आणि परत एकदा जाहीरपणे धर्मांतराच्या निर्णयावर ठाम असल्याची भीम गर्जना करतात. या परिषदेच्या मंचावरुन उभ्या भारताला एक आव्हान करतात की, “हिंदूनी जातीयवादाच्या अमानवी कृत्यानी  माझ्या बांधवांच्या कित्येक पिढ्यांवर गुलामचे, दारिद्र्याचे व पराकोटीचे वेदनामय जीनव आमच्यावर लादले. अत्यंत घृणास्पद नि खालच्या दर्जाची वागणूक दिली. या धर्मात समतेचा असलेला अभाव मानवी जिवनास हानिकारक आहे. त्या मानाने शीख धर्मातील समतेचि तत्वे समाजाला एकसंघ ठेवण्यात व उत्कर्ष करण्यास अत्यंत अनुकूल व प्रगती प्रवर्तक आहेत. त्यामूळे मला शीख धर्म मनातून आवडु लागला आहे. हिंदू धर्माचा त्याग करणे निश्चित झाले आहे. धर्मांतर करण्याचा निर्णय अढळ आहे, फक्त तो केंव्हा करायचे हे आजून ठरायचे आहे.”  अशा प्रकारे आपला पुढील कार्यक्रम काय असेल याचं ओझरतं दर्श त्यांच्या या भाषणातून तमाम त्या लोकांपर्यंत ज्पोहचलं ज्यांच्या पर्यंत पोहचायला पाहिजे होतं.
प्रतिनिधी सुवर्ण मंदिरात पाठविले.
आता मात्र धर्मांतराची चळवळ अत्यंत वेगाने आकार घेऊ लागली. बाबासाहेबांच्या वादळी प्रचाराने भारतभर खडबळ उडाली. हिंदू धर्मातील सर्व आघाड्या पेटून उठल्या अन बाबासाहेबांवर चतूरस्त्र टिका होऊ लागली. बाबासाहेब मात्र प्रत्येक टिकेगणिक अधिक दृढनिश्चयी व ठामनिर्णयी बनत गेले. शीख धर्माकडील त्यांचा झूकाव अल्लेखनिय होता. उपलब्ध तमात धर्मातुन हा धर्म बाबासाहेबाना आकर्षित  करुन गेला. पन भावनेच्या भारात तडकफडकी निर्णय घेऊन नंतर पश्चाताप करनार बाबासाहेब नव्हते.  जो कुठला धर्म स्विकारायचा त्याचा खोलवर अभ्यास करुन, मानवि मुल्यास असलेली पोषकता तपासून सर्व शंका कुशंकाचे निराकरन  झाल्या नंतरच धर्मांतर करायचे या मताचे बाबासाहेब होते. आपले चिरंजीव यशवंत आंबेडकर व पुतन्या मुकंद याना बाबासाहेबानी अमृतसर येथील गुरुद्वारेत वास्तव्यास पाठविले. या वास्तव्याच्या काळात गुरुद्वारेतील शीख  बांधवानी या दोन तरुणांचे मोठे आदरातिथ्य केले.  दोन महिने पाहुणचार घेऊन मोठ्या आनंदाने ही मुलं परत आली.
१३ जणांची तुकडी
१८ सप्टे १९३६ रोजी बाबासाहेबानी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी आपली १३ जणांची एक तुकडी अमृतसरला रवाना केली.  मुलगा व पुतण्या यानी दिलेल्या वृत्तांताचा  हा सकारात्मक परिपाक होता. धर्मांत चळवळीतील शीख धर्माच्या दिशेनी पडलेले हे आजून एक पाऊल होते. हा हा म्हणता ही तुकडी अमृतसरला पोहचून शीख धर्माचा अभ्यास सुरु केला. दरम्यान काळात झालेल्या पत्र व्यवहारात शीख धर्माचे गुणगाण गाणारे अनेक पत्र बाबासाहेबाना मिळाले. उत्तरादाखल लिहलेल्या  पत्रात बाबासाहेबानी या सर्व तरुणांचे अभिनंदन केले व धर्माचा अभ्यास करण्यास शुभेच्छा दिल्या.  ईकडे  बाबासाहेब ईतर कामात गढून गेले.  याच दरम्यान या तेरा सदस्यानी एक घोळ घातला.  शीख धर्माचा त्यांच्यावर ईतका प्रभाव पडला की या सर्वानी बाबासाहेबांची परवानगी न घेता तडक शीख धर्माची दिक्षाच घेऊन टाकली.  खरतर बाबासाहेबानी याना अभ्यासासाठी पाठविले होते. धर्म स्विकारण्याचा निर्णय आजून व्हायचा होता.  बाबासाहेबांच्या आदेशाची वाट न पाहता घेतलेला हा निर्णय ईतका भारी पडला की ते सर्व सदस्य थेट चळवळीतून बाहेर फेकल्या गेले.  जेंव्हा ते मुंबईत परतले तेंव्हा त्याना कुणी काळ कुत्रही पुसेना.  यांचा कधी विषय निघाल्यास  बाबासाहेब म्हणत, “देव जाणे त्यांच काय झालं ते” अशा प्रकारे धर्मांतर  चळवळीची वाटचाल चालू होती.
शीखांशी मतभेद आणि काडीमोड
बाबासाहेब शीख धर्माचा स्विकार करतील याची सर्वत्र चर्चा चालू झाली. याच दरम्यान आजून एक दुसरीच समस्या उद्भवू लागली. अस्पृश्याना विधिमंडळात मिळालेले आरक्षण हे हिंदू धर्मातील एक जात (वर्ग) म्हणून मिळाले होते. पण जर अस्पृश्यानी हिंदू धर्माचा त्याग करुन शीख धर्म स्विकारल्यास या आरक्षणाचे काय? असा नवीनच निर्बंधीक पेच तयार झाला. बरं शीखानाही राखिव जागा मिळाल्या होत्या पण त्या फक्त पंजाब प्रांतापुर्ती मर्यादीत होत्या. धर्मांतरा नंतर शीख हे भारतभर असणार पण शिखांचे आरक्षण मात्र भारतभर लागू नव्हते, अशी ही नवीन अडचण उभी ठाकली. अस्पृश्यानी शीख धर्म स्विकारावा यासाठी हिंदू महासभेचा पाठिंबा  मिळविण्याचे काम सुरु झाले. १८ जुन १९३६ रोजी बाबासाहेब व डॉ. मुंजे यांची या संदर्भात एक भेट झाली. सर्व बाजुनी चर्चा झाल्यावर  व हिंदू महासभेच्या प्रमुख सदस्यांची संमती घेतल्यावर डॉ. मुंजे व हिंदू महासभेनी अस्पृश्यांच्या धर्मांतरास व शीख धर्म स्विकारण्यास पाठिंबा दिला.  पण शीख मिशनचे नेते व बाबासाहेब यांच्यातील मतभेद पराकोटीला गेले. याचा एकंदरीत परिणाम असा  झाला की शीख धर्म स्विकारण्याचा  विचार सोडून दयावा लागला. आता नवीन धर्म शोधण्याची अतिरिक्त जाबाबदारी अंगावर पडली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २६ (धर्मांतराची भीम गर्जना)


अनेक प्रयत्न करुन बाबासाहेब दलितांना सामाजीक न्याय मिळवून देण्यासाठी दिवस रात्र झटत राहिले. सवर्णाच्या मनात कधितरी अस्पृश्यांबद्दल सदभावना जागॄत होईल या आयेशी ते सतत प्रयत्नशील होते. हिंदू धर्मात आपल्याला आदराची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यानी मोठा लढा दिला. मागच्या पाच वर्षापासून नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेबांचे अनूयायी मोठ्या जिकरीने लढा चालविला होता. पण पाषाणहृदयी हिंदूना अस्पृश्य कधीच मानवाच्या बरोबरीचे वाटले नाही. त्याना दलित व अस्पृश्य जनता ही नेहमी कुत्र्या मांजरापेक्शाही खालच्या दर्जाची वाट्ली. याचा एकंदरी परिणाम असा झाला की बाबासाहेबानी समतेसाठी केलेला झगडा मागच्या पाच वर्षात मातीत मिसळला. याच दरम्यान जेंव्हा नाशिकचा लढा चालू होता तेंव्हा बाबासाहेब गोलमेज परिषदेत गुंतून गेले होते, त्यामूळे त्यानी आपल्या कार्यंकर्त्यां मार्फत हा झगडा सतत पाच वर्ष केला. तिकडे  गोलमेज परिषदेच्या माध्यामातून जमेल तितकं अस्पृश्यांसाठी खेचून आणण्याचे काम तर चालूच होते व त्याला चांगले यशही आले. पण नाशिकच्या लढ्यात मात्र सनातनवाद्यानी अस्पृश्याना मंदिर प्रवेशापासून रोखण्यासाठी मोठी ताकत लावून लेढा दिला.
शेवटी या सनात्यन्यांच्या अमानवी वृत्तीला कंटाळून बाबासाहेब एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतात तो म्हणजे धर्मांतराचा. ज्या धर्मात आम्हाला कुत्र्याचिही कदर नाही त्या धर्मात आता आपण राहायचे नाही असा निर्धार करुन बाबासाहेब धर्मांतराचा विचार आपल्या कार्यकर्त्याना बोलून दाखवू लागले, त्यांची मन चाचपून पाहू लागले. कार्यकर्त्यांकडून सकारात्म व नकारात्मक अशा दोनी प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण धर्मत्यागाच्या बाजून आलेला कल प्रचंड व लक्षणीय होता. आता मात्र बाबासाहेबाना बळ आलं. आपल्या समाजातील मोठा जनसमूदाय या हिंदू धर्माचा त्याग करण्यास तयार आहे हे कळल्याबर बाबासाहेबांवर दुसरी जबाबदारी येऊन पडली ती म्हण्जे पर्यायी धर्म निवडायचा कुठला. ईथून निघूण परत दुस-या अशा धर्मात अजिबात जायचे नव्हते जिथे परत जातियवादाची पुनरावृत्ती होईल. प्राथमिक पातळीवर बाबासाहेब कार्यकर्त्यांशी संवाद साधून धर्मातंर करण्याच्या निर्णयावर येतात. आता वेळ होती या धर्मांतराच्या घोषणेची. सा-या जगाला ओरडून सांगयची की या हिंदूच्या अमानवी वागणूकिस कंटाळून माझा अस्पृश्यवर्ग धर्मांतर करणार आहे हे सांगण्याची. अन येत्या काही दिवसात येवल्यात भरणा-या परिषदेत ही घोषणा करण्याचे ठरले.

येवला परिषद
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे परिषद भरली. हा हा म्हणता भारताच्या कानाकोप-यातून अस्पृश्य जनता येवले नगरी मोठ्या संखेनी येऊन धडकली. लोकांची अलोट गर्दी रस्त्यानी ओसंडू लागली. प्रचंड उत्साह व बाबासाहेबांच्या प्रती असलेली निष्ठा जमलेल्या लोकांच्या वर्तनातून, त्यांच्या शिस्तीतून दिसत होती. राहण्याची, खाण्यापिण्याची सोय करताना संयोजकांच्या नाकी नऊ आले ईतका प्रचंड जनसमूदाय येवले नगरी धडकला. एकून १०,००० लोकांचा हा जनसमूदाय येवल्या नगरीत बाबासाहेबांच्या नावाच्या गगनभेदी आरोळ्यानी आकाश दुमदुमवून सोडत होता. अन बाबासाहेबांचे येवला परिषदेस आगमन होते.
येवला परिषदेचे स्वागताध्यक्ष आयू. अमृत धोंडीबा रणखांबे होते. लोकानी भरगच्च भरलेल्या सभामंडपात बाबासाहेबांची अत्यंत प्रभावी अन हिंदू धर्माचा समाचार घेणारे तेजस्वी भाषण सुरु झाले. बाबासाहेब म्हणतात, “मागच्या पाच वर्षापासून आपण सर्वानी मोठ्या कष्टाने काळाराम मंदिराची चळवळ चालविली. पैसा आणि वेळ खर्ची घालून चालविलेला हा पाच वर्षाचा झगडा व्यर्थ गेला. हिंदूच्या पाषाण हृदयाला पाझर येणे अशक्यप्राय आहे  हे आता पक्के झाले आहे. काळारामाच्या निमित्ताने माणूसकिचे अधिकार मिळविण्यासाठी चालविलेली ही चळवळ निष्फळ ठरली. अशा या निर्दय व अमानूष धर्मापासून फारकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण हिंदू आहोत केवळ याच कारणास्तव आपल्यावर हे अस्पृश्यत्व लादण्यात आले आहे. तेच जर आपण दुस-या धर्माचे असतो तर हिंदू आपल्यावर अस्पृश्यत्व लादू शकले असते काय? हा धर्म सोडून एखाद्या दुस-या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत नाही काय?” बाबासाहेबांच्या या वाक्यानी सभेतील लोकं मोठ्या उत्साहात टाळ्याच्या गडगडाटाने प्रतिसाद देतात. हा प्रतिसाद मूकपणे सांगून गेला की, ’होय, आम्हाला हा धर्म फेकून दयावयाचा आहे, कधी व कसे ते फक्त तुम्ही सांगा’ अन हा मूक संदेश बाबासाहेबानी ऐकला. अगदी त्यांच्या मनातला विचार अस्पृश्यानी प्रतिध्वनीत केल्यावर बाबासाहेब मोठ्या आवेशाने पुढची भीमगर्जना करतात जी ऐकून भारतच नाही उभ्या भूतलावर मोठं वादळ उठतं. ते म्हणतात, “मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हतं. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.” ही भीम गर्जना ऐकून अस्पृश्य लोकामधे एक  उत्साहची लाट उसळते. नसा नसात नवचैतन्य भरणारी ही भीम गर्जाना म्हणजे हजारो वर्षाची हिंदूंची गुलामी झिटकारण्याची अभूतपूर्व क्रांतीची डरकाळी होती.  आता अस्पृश्यांच्या जिवनाचे एक नवे पर्व सुरु झाले, ते या येवलेभूमीनी अनूभवले. जो अस्पृश्य काल या परिषदेस येताना हिंदूचा गुलाम होता, लादलेल्या द्रारिद्र्याचा बळी होता.  आता मात्र तो या घोषणेनी मनोमनी या सर्व गुलामीतून मूक्त झाला होता. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या भीम गर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांच्या शेवटच्या माणसा पर्यंत पोहचला तो म्हणजे, एक तर आता हिंदूच्या छाताळावर बसून बाबासाहेब आपली अस्पृश्यता घालवतील (जे अशक्य होतं) किंवा या हिंदू धर्माला झिटकारुन धर्मांतरा द्वारे मानवी मूल्ये जपणा-या धर्मात मोठ्या मानाने आमचे धार्मिक पुनर्वसन करतील. त्यासाठी लागणारी मानसिक तय्यारी करण्याचा ईथे निर्णय करुन अस्पॄश्य बांधव पुनर्जन्म झाल्यागत स्वत:मधे एक अप्रतिम बदल  झाल्याचे पाहू लागला. हा बाबासाहेबांच्या भीमगर्जनेचा प्रभाव होता, त्यांच्या मानवी मुल्याच्या झगड्याचा परिणाम होता.

भाषणाच्या शेवटी बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्याना आदेश देतात की, आता हा नाशिकचा काळारम मंदिर सत्याग्रह बंद करा. पाच वर्ष आपण खूप खटाटोप केली. हिंदुच्या हृदयात आपल्यासाठी आजिबात स्थान नाही तेंव्हा आता हा धर्म सोडून आपण नव्या धर्मात जाणार आहोत. एक नवे पर्व सुरु होत आहे. आम्हाला देवाच्या दर्शनासाठी वा भक्तीभावासाठी म्हणून हा प्रवेश पाहिजे होता असे नव्हे तर समानतेचा अधिकार म्हणून हा प्रवेश हवा होता. जेंव्हा की यांचा देव अन हे आम्हाला प्रवेश देऊन समान मानण्यास मागच्या पाच वर्षात मोठ्या एकीने आमच्या विरोधात लढले. तेंव्हा आता आम्हीही निर्णायक वळणावर आलोत. मानवी मुल्य़े नाकारणा-याना नाकारण्याच्या निर्णयावर आलोत. जातीभेद मानणारा असा हा यांचा देवही नको व त्याचा धर्मही नको. आपल्या वाटा आपणच शोधू या. अन आता नव्या धर्मात जाण्याच्या तय्यारीला लागू या. आणि अशा प्रकारे अस्पृश्यांच्या आयुष्यात एका नव्या पहाटेच्या भीमगर्जनेनी ही येवले परिषद संपन्न होते. कार्यकर्ते मोठ्या जलोषात व उत्साहात परतीला निघतात.

भीम गर्जनेचे उमटलेले पडसाद
बाबासाहेबांच्या भीम गर्जनेनी उपस्थीत पत्रकार लोकांच्या पायाखालची जमीन सरकते. तसही बाबासाहेबांच्या तोफेतून निघणारे अनपेक्षित गोळे मोठे धक्कादायक असतात याचा पत्रकाराना चांगलाच अनूभव होता. पण हा धर्मांताची बॉंब मात्र पुरता भारद हादरवून सोडाणारा होता. धर्मांध लोकांच्या गालावर मारलेली ही थापड ईतकी प्रभावी नि तडाखेंबंद होती की उभ्या भारतात मोठे वादळ येते. दुस-या दिवशीच्या सर्व मुखपत्रातील प्रथम पानावर ही बातमी छापून येते. बाबासाहेब धर्मातंर करणार ही बातमी जगभर पसरते. हिंदू धर्माच्या अमानवी छळाला कंटाळून मोठ्या शौर्याने केलेली ही गर्जना हिंदू धर्मातील विविध लोकांमध्ये मोठं वादळ उठवून जाते. हिंदू विचारवंत, पिठाधिश, मठाधिश व सामान्य नागरीक प्रत्यक स्थरावर याचा मोठा परिणामकारक प्रतिसाद उमटला. वरच्या सर्व स्थरांत मोठा गहजब माजला. अन बाबासाहेब मात्र धर्मांतराच्या बॉंबनी घायाळ झालेल्या या हिंदूच्या छिन्न विछिन्न अवस्था न्याहाळात निवांत बसले होते. त्याना हेच पाहायचे होते की आतातरी हा समाज आम्हाला सुधारतो का.
हिंदू धर्मातील समाजसेवक अन पुरोगामी वर्ग मात्र बाबासाहेबांच्या या भीम गर्जनेनी कमालीचा दुखावतो, अस्वस्थ होतो. कारण ईथला पुरोगामी वर्ग अस्पृश्यांच्या हितासाठी मोठ्या कष्टाने राबत होता. अस्पृश्यांचा उध्दार व्हावा याची मनातून तळमळ असलेला हा पुरोगामी हिंदूवर्ग बाबासाहेबाना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त करु लागला. लगेच धर्मांतर न करता आजून पाच वर्ष तरी वाट पहावी अन हिंदू समाला सुधरण्याची संधी द्यावी असे अर्ज करणारे अनेक पत्र बाबासाहेबाना पाठविण्यात आले.
पण काही धर्मांध हिंदूना मात्र बाबासाहेबांचा हा  निर्णय सुखावून गेला. त्यांच्या मते एकदाची अस्पृश्यांची घाण या हिंदू धर्मातून बाहेर पडेल. हिंदुना सुगीचे दिवस येतील. अस्पृश्यांची संख्या ईतकी प्रचंड होती की जर तो मुस्लिम वा ख्रिश्चन धर्मात गेल्यास त्यांच्या संख्याबळात होणारी वाढ हिंदूना निस्तेनाबूत करुन सर्व आघाड्यावर आपलं वर्चस्व गाजवेल हे या मुर्खांच्या लक्षातच येत नसे. बाबासाहेबानी मुस्लिम धर्म निवडल्यास या देशाचं नाव एक रात्रीत बदलून ईस्लामीस्तान होईल साधं एवढं समजण्याची अक्कल या हिंदू धर्मांध कट्टरपंथीयात नव्हती. पण याची जाण असलेले हिंदू मोठे अस्वस्थ झाले. कुठल्याही परिस्थीतीत बाबासाहेबाना या धर्मांतरापासू रोखणे गरजेचे आहे याची जाण असलेला हिंदूवर्ग बाबासाहेबाना अक्षरश: विनवन्या करु लागला.

अनेक धर्मगुरुंच्या प्रस्तावांचा राजगृहावर वर्षाव
बाबासाहेब हिंदू धर्म त्याग करुन दुस-या कुठल्यातरी धर्मात प्रवेश करणार याची बातमी हा हा म्हणता साता समूद्रापार जाते अन अनेक धर्माचे धर्मगुरु जे नेहमीच आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्यास मोठ्या कष्टानी उभं जग पालथं घालत असतात त्याना मोठी संधी आयती चालून आल्याने उकळ्य़ा फूटू लागल्या.  अशा या धर्मगुरूनी बाबासाहेबाना आपल्या धर्मात यावा यासाठी अनेक आघाड्या उघडून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालू केले. राजगृहावर देश विदेशातून अक्षरश: अशा धर्मगुरुंद्वार पत्रांचा व तारांचा वर्षाव होतो.
ख्रिश्चनांचे धर्मगूरु बिशप ब्रेनटन थॉबर्न ब्रॅडले, मेथॉडिस्ट एपिस्कोपल चर्च मुंबईचे बिशप यानी बाबासाहेबाना ख्रिश्चन धर्म स्विकारुन आपल्या अस्पृश्य बांधवांचा उद्धार करुन घ्यावा अशी विनंती केली. यावेळी त्यानी त्यांच्या धर्मात आधिपासूनच कसा अस्पृश्य समाज धर्मांतरी होऊन मोठ्या सन्मानाने जगत आहे याचे दाखले.  ख्रिश्चन मिशन-यांकडे असलेल्या अमाप पैशाचा कसा दलितांच्या उद्धारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येईल याचिही कल्पना दिली. शिक्षण क्षेत्रातील मिशन-यांचं कार्य मोठं लक्षणिय व वाखाणन्याजोग. याचा दलिताच्या उत्कर्षासाठी अत्यंत प्रभावी नि सकारात्मक प्रभाव कसा पडेल हे ही समजावून सांगितलं.
मुस्लिम धर्मातील विधिमंडळाचे एक सदस्य गौबा यानी बाबासाहेबाना तार करुन मुस्लिम धर्मात येण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर निजामाच्या राज्यातून काही मुस्लिम धर्मगुरु बाबासाहेबाना भेटण्यास आलेत.  बाबासाहेबानी ईस्लाम स्विकारल्यास हैद्राबाजच्या निजामांकडुन कशी पैशाची व ईतस सुविधांची बरसात केली जाईल याचा पाढा वाचण्यात आला. त्याच बरोबर अस्पृश्यानी ईस्लाम स्विकारल्यास त्यांच्या केसालाही हात लावण्यास कसा हिंदूचा थरकाप उडेल हे ही बाबासाहेबाना ठासून सांगण्यात आले. हे सत्यही होते. हिंदू धर्माचे लोक सहसा मुसलमानांच्या वाटेला जात नाहीत. अस्पृश्यांना हिंदूंच्या छळातून मूक्त करण्याचा खरतर हा सोपा मार्ग होता. पण बाबासाहेबाना अस्पृश्यांची फक्त हिंदूपासून मुक्ती करावयाची नव्हती तर त्याना समतेची वागणूक मिळवून देण्या बरोबरच सर्व आघाड्यावर स्त्री व पुरूष यांचा वयक्तील पातळीवरही मोठा बदल घडावून आणावयाचा होता. शैक्षणीक क्रांती घडवून आणावयाची होती. बौद्धिल पातळीवर मोठी मजल मारायची होती. ज्ञानाच्या जगात गरुडाझेप घ्यावयाची होती. हे ईस्लाम मध्ये शक्य  नव्हते. बाबासाहेबानी मनोधैर्य एकवटून निजामाच्या प्रलोभनाना नकार दिला व ईस्लामचा मार्ग नाकारला.
शिख धर्माचे धर्मगुरू व सुवर्ण मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष सरदार दरिपसिंग दोबीयाबाबासाहेबाना तार करुन अस्पृश्यांनी शिख धर्मात यावे अशी विनंती केली.  एकेश्वरी शिख धर्म अस्पृश्यांचं मनोभावे स्वागत करायला तयार आहे. त्याच बरोबर आमच्या धर्मात सर्वाना समान वागणूक दिली जाते नि विद्यार्जनाचे, उत्कर्षाचे सर्व मार्ग शिख बंधू व भगिनीना सदैव उघडे असल्या कारणास्तव या धर्मात तुमचा केवळ नि केवळ उत्कर्षच होईल अशी हमी दिली. बाबासाहेब मधल्या काळात शिख धर्माकडे झुकतातही.  बाबासाहेबाना हा धर्म तसा ईतरांच्या तुलनेत जरा जवळचा वाटू लागला होता.
बौद्ध धम्माचे अनुयायी, महाबोधी संस्था बनारस येथील कार्यवाह यानी बाबासाहेबाना तार केली. भारतात जन्मलेल्या, जातीभेद ना मानणा-या, सर्वाना समान समजणा-या आमच्या बौद्ध धम्मात आपण व आपले अनुयायी आल्यास तुम्हा सर्वांचा मोठा उत्कर्ष होईल. मानवी मुल्ये जोपासणारा आमचा बौद्ध धम्म उभ्या जगात पसरला आहे. भूतलावरील प्रत्येक काना कोप-यात आमच्या बौद्ध धम्माची मोठी ख्याती आहे, अनुयायी व धम्म बांधव आहेत. आशीया खंडातील बहुसंख्य देशानी बौद्ध धम्म स्विकारलेला आहे. ईश्वराला काळीमात्र महत्व न देणारा व समस्त मानव जातीला स्वातंत्र्य, समता व बंधूत्व शिकविणारा आमचा बौद्ध धम्म तुमचा तेजोमय भविष्य घडवून सोडेल. तळागळातल्या लोकांच्या  प्रती अत्यंत करुना बाळगणारा बौद्ध धम तुम्हा सर्वांचा नवा ईतिहास रचेल अशा प्रकारचं एकंदरीत संदेश बाबासाहेबाना मिळतं.
गांधी  मात्र टोमणं मारायला विसरत नाहीत. अस्पृश्यांचा प्रश्न निकाली निघण्याच्या टप्प्यात असताना, शेवटाच्या निर्णायक वळणावर असताना बाबासाहेबानी अशी घोषणा करणे केवळ दुर्दैव आहे. हरीजन बांधव आंबेडकरांचे काही एक ऐकणार नाही, धर्म काय अशी रातोरात बदलण्याची वा अंगावरचे कपडॆ बदलावे तशी बदलण्याची गोष्ट आहे का? बहुतांश हरीजन आंबेडकरांच्या या धर्मांतरास साथ देणार नाही अशी मुक्ताफळं गांधीनी उधळली. 
स्वातंत्र्यवीर सावरकर यानी मात्र मोठ्या अस्वस्थ व दु:खी मनाने या धर्मांतराच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. सावरकरानी रत्नागिरी व परिसरात मोठ्या प्रमाणात अस्पृश्य निवारणाचे कार्या हाती घेतले  होते. त्यांनी सहभोजन व मंदिर प्रवेशाचे कार्य मोठ्या झपाट्याने चालविले होते. रत्नागिरी सारख्या कट्टरपंथी कोकणस्थांच्या बालेकिल्ल्यात सहभोजन घडवून आणने म्हणजे गंमत नव्हती. अस्पृश्य बांधवानी हिंदू धर्मातच रहावे अन यासाठी त्यानी बदलण्याची गरज नसून हिंदु धर्माने कात टाकावी असा विचार मांडाणारे सावरकर हे नंतर कट्टरपंथीया द्वारे चांगलेच झोडपले जातात.
अशा प्रकारे बाबासाहेबांच्या धर्मातराच्या भीम गर्जनेनी सारा भारत दुमदुमू लागला.  सर्वत्र मोठा गहजब उडाला. ईतर धर्मीयाना ही संधी वाटू लागली तर गांधी, सावरकरादि नेत्यानी बाबासाहेबांवर तोफा डागल्या. सर्व वृत्तपत्रातून झाडून टिकांचा वर्षाव होऊ लागला. माथेफिरू हिंदूनी मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. काहीनी तर चक्क तारा पाठवून तसे कळविले. एकानीतर चक्क रक्ताने पत्र लिहून पाठविले की जर तुम्ही  धर्मांतर केलात तर तुमचा खून करु. अशा सर्व स्थरातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. एकंदरीत ही घोषणा हिंदूच्या जिव्हारी लागली होती व तशा  प्रतिक्रिया देशभर उमटल्या. बाबासाहेब मात्र सेनापती जसे शत्रूच्या किल्यावर तोफ डागून शांतपणे उध्वस्त तटबंधी न्याहाळतो तसे हिंदूवर धर्मांतराची तोफ डागल्यावर शांतपणे कोसळणारी हिंदू तटबंदी न्याहाळत होते.

शंकराचार्थ पदाची मागणी:
सर्वत्र धर्मांतराच्या विरोधात हिंदूनी अक्षरश: बाबासाहेबांवर टिकेची झोड उठविले. तिकडॆ ख्रिश्चन लोकं हिंदूंच मोठ्या प्रमाणात धर्मांतर करुन यांच्या संख्याबळाला जबरी सुरुंग लावत होते. मुस्लिमानी सुद्धा मोठ्या प्रमाणात हिंदूचे धर्मांतर घडविणे चालूच ठेवले होते. अन जोडीला बाबासाहेबांनी केलेली घोषणा प्रत्यक्ष कृतीत उतरल्यास हिंदू एका झटक्यात सर्व आघाड्यावर मागे फेकल्या जाईल हे चित्र दिसू लागलं. येवले परिषदे नंतर बाबासाहेब वसईचे मित्र डॉ. सदानंद गाळवणकर यांच्याकडे मुक्कामी गेले. तिथे हिंदू धर्माचे प्रसिद्ध धर्मगुरु मसूरकर महाराज बाबासाहेबांची भेट घेतात. हे मसूरकर महाराज हिंदुच्या धर्मांतराचा धोका जानणारे व तो टाळण्यासाठी खटाटोप करणारे एक सच्चे हिंदू होते. ईतर धर्मांधासारखे डोळ्यावर पट्टी बांधून हिंदू म्हणवून घेणारे नव्हते. यानी स्वत: गोव्यातील दहा हजार धर्मांतरीत होऊन ख्रिश्चन बनलेल्या लोकांचे शुद्धिकरण करुन हिंदु धर्मात परत घेतले होते.  ते मोठ्या कळकळीने बाबासाहेबान म्हणतात की धर्मांतर हा तोडगा नसून तुम्ही कृपया यावर मार्ग सांगा. तेंव्हा बाबासाहेब एक बिनतोड प्रस्ताव मसुरकरांच्या पुढे ठेवतात. बाबासाहेब म्हणतात, “अस्पृश्य हिंदुला एका वर्षासाठी शंकराचार्य पदावर बसवावे, अन तुम्ही सर्व हिंदूनी व शंभरेक ब्राह्मणानी वर्षभर सहकुटूंब त्या अस्पृश्य शंकराचार्याच्या पाया  पडून मनोभावे पुजा करावे. तेंव्हा आम्ही मानू की तुम्ही आम्हास समान समजता व तो दर्जा देण्याईतपत तूमचे हृदय पालट झाले आहे.” बाबासाहेबांचे हे वाक्य ऐकून मसुरकरांचा मुखवटा पार गडून पडतो. कारण अस्पृश्याला शंकराचार्य बनविण्यासाठी लागणारी मानसिकतात ईतरांची तर सोडाच पण खुद्द मसूरकरांची सुद्धा नव्हती. बाबासाहेबांचं डाव उलटविण्याचं कौशल्य फारच अप्रतिम होतं. पुढच्या माणसाला पार नागडा करुन सोडायचे. अशा प्रकारे शंकराचार्याची मागणी करुन बाबासाहेबानी मसूरकराना त्या खिंडीत गाठले जिथे मावळे त्यांचेच, आयुधं त्यांचीच, हमल्याची रुपरेषा त्यांचीच अन दाणदाणही उडाली त्यांचीच. हे असले भीमास्त्र सोडाण्यात बाबासाहेब मोठे पटाईत होते.  


पुण्यातील परिषद
धर्मांतराचा निर्णय तळीस नेण्याचे काम जोमाने चालविले जाऊ लागले. जाने १९३६ च्या १२ व १३ तारखेला पुण्यात परिषद भरविण्यात आली. प्रा. एन. शिवराज यानी या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले होते. अध्यक्षिय भाषणात शिवराज  यानी एक जबरदस्त मुद्दा मांडला. ते म्हणाले आर्यांनी आणलेला हिंदू धर्म ईथे रुजण्या आधी आदिद्रविडांचा एक तेजस्वी इतिहास या मातीला आहे. आपण तो पुनरुज्जीवित करावा. बाहेरून आलेल्या धर्माला पुरुन उरणारा आदिद्रविडांचा इतिहास मोठा प्रभावी नि तेजस्वी आहे. डॉ. पुरुषोत्तम सोळंखी जे सुरुवातीला धर्मांतराच्या विरोधात होते ते आता मात्र अनुकूल झाले होते. त्यानी आपल्या भाषणात नवीन धर्म स्थापन्याचा प्रस्ताव सुचविला होता. बाबासाहेबानी आपल्या तेजस्वी भाषणात धर्मांतराची गरज, त्याची उपयुक्ततात पटवून देताना धर्मांतरामूळे रोजगाराचा प्रश्न मिटणार नाही हे अधोरेखित केले. त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागेल हे ठासून सांगितले. धर्मांतर हा मानवी मुल्याचा प्रश्न असून पोटा पाण्याचा प्रश्न मिटविण्याचा मार्ग नव्हे. उपजिविकेच्या आघाडीवर लढण्यास सज्ज होण्याचे आवाहन केले. पाच वर्षा    पर्यंत हिंदूच्या हृदयपालटाची वाट पाहून तदनंतर धर्मांतर करु असा निर्वाणीचा ईशार दिला. अशा प्रकारे हिंदूना ५ वर्षाचा अल्टिमेटम देऊन बाबासाहेब पुढच्या कामाला लागतात.  

शुक्रवार, ८ जुलै, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २५ (रमाईला शेवटचा निरोप)


बाबासाहेबांच्या आयूषातील एक अर्थवट प्रवास........ रमाई
अडचणी अन बाबासाहेब हे समिकरण आता बाबासाहेबांच्या शेवट पर्यंत चालणार हे बाबासाहेब जाणून चुकले होते. अत्यंत सोपं काम सुद्धा कुठल्या ना कुठल्या कारणानी आव्हान बनुन उभं ठाकायचं. नंतर बाबासाहेबानी भीम शस्त्र उपसायचे अन त्या आव्हानाला सामोर जायचं. आपली सर्व शक्ती पणाला लावून अशा आव्हानाना लोळवायचं अन विजय मिळवून आपली क्षमता सिद्ध करायचं याची मालिका आता अखंडपणे चालू होती. सामोर आलेल्या सर्व अडचणींवर मात करण्याची अंगभूत क्षमता अन आव्हान स्विकारण्याच्या वृत्तीमूळे जागोजागी बाबासाहेबांचा जयजकार होई. हे सर्व चालू असताना एक अत्यंत महत्वाची घट्ना घडते. बाबासाहेबाना पूरुन उरणारी ही घटाना मात्र बाबासाहेबांचं पुरतं नामोहरम करून सोडते. प्रत्येक ठिकाणी विजय खेचून आणणारा हा वीर ईथे मात्र हताशपणे पराजय पत्कारतो. ती घटना म्हणजे बाबासाहेबांची जिवनसंगिनी रमाई बाबासाहेबानी आयूष्याच्या प्रवासात अर्ध्या वाटेत सोडून जाते अन बाबासाहेब त्याना थांबविण्यात सर्वस्वी अपयशी ठरतात. केवळ हताश होऊन आपल्या परमप्रिय पत्नीला जाताना पाहण्या पलिकडे बाबासाहेब काहीच करु शकत नाही.

डिसेंबर १९३४  मध्ये बाबासाहेब जेंव्हा सिंहगडावर विश्रांती घेत होते तेंव्हा आमचा सिंहगड महारानी बाटवला म्हणून शेजारपाजरचे सनातनी सिंहगडावर मुक्कामी असलेल्या बाबासाहेबांवर चालून जातात. बाबासाहेबानी मोठ्या धैर्याने तो हल्ला परतवून लावला. हि बातमी रमाईला कळते तेंव्हा त्यांच्या मनात धस्स होतं. बाबासाहेबांवरील या हल्ल्याचा त्यानी असा धसका घेतला की शेवट पर्यत त्या उठतच नाहीत. रमाई अत्यंत धार्मि वृत्तीच्या, व्रतवैकल्य करणा-या, होत्या. शनिवारचा उपवास कधीच चुकत नसे. आपल्या लढवैय्या पतीचा रक्षणकर्ता ईश्वर त्यांच्यावर सदैव प्रसन्न राहो यासाठी त्या पराकोटीची ईश्वरभक्ती करीत.   संवेदनशील मन, आत्मयज्ञ करण्याच्या नैसर्गिक वृत्ती अन कुटूंब वत्सल रमाईनी बाबासाहेबांच्या व्यस्त जीवनात कधिच अडथडा न आणता स्वत: त्यांच्या संसाराचा डोलारा आजवर सांभाळला. पण सिंहगडच्या घटने नंतर त्या हादरुन गेल्या.
याच दरम्यान बाबासाहेबानी मुंडन केले होते. ते हवापालटासाठी म्हणून वसईचे डॉ. सदानंद गाळवणकर यांच्याकडे राहावयास गेले होते. रमाईची तब्बेत डिसेंबरात बिघड्ली तेंव्हा पासून आता मे १९३५ चा तिसरा आठवडा सुरु झाला तरी सुधारलीच नव्हती. एकंदरीत हा आजार सहा महिन्याहून अधिककाळ टिकला होता. बाबासाहेब वसईला निघून गेल्यावर रमाई अधिकच हताश झाल्या.  मुलगा यशवंत व पुतण्या मुकूंद यानी आईच्या खुषी खातर तीच्या परिने पुजा पाठ व ईतर व्रतवैकल्याची दैनंदिनी सांभाळायसा सुरुवात केली. आता तर रमाईल उठून साधी पुजा करणेही जमेनासे झाले होते. काळ जवळ आला याची रमाईला जाणिव होऊ लागली होती. त्या दिवशी रात्री त्याना खूप ताप आला. त्या अक्षरश: तापानी फणफणू लागल्या, शरीराची लाही लाही झाली. शंकरमामा (रमाईचे बंधू) डॉक्टरांकडे धावले. रात्रीच डॉक्तराना बोलावून आणलं. ईंजेक्षन देऊन काही गोळ्या घ्यायची सुचना दिली व डॉक्टर निघून गेले. बाबासाहेबाना बोलावून घ्या असं शंकरमामाना हळूच सांगितलं. डॉक्टरांच्या या सल्ल्यानी मामा पुरता हादरुन गेला. बाबासाहेब नेमकं कुठं गेले होते याची माहिती नव्ह्ती. काहिंच्या मते ते वसईला गेले होते तर काहिंच्या मते ते पनवेलला. त्या काळात संपर्काची साधनं नव्हती. दुस-या दिवशीच्या सायंकाळ पर्यंत कळलं की बाबासाहेब वसईला आहेत.
रमाईची तब्बेत अत्यंत खालावली ही बातमी त्यांच्या सर्व ईष्टमित्रांमध्ये पसरली. राजगृहात अचानक लोकांची वर्दळ वाढली. रमाईला पंढरीला घेऊन जाणारे ग्यानबुवा महाराज व त्यांचे दोन भजनी शिष्य सर्वप्रथम राजगृहात धावून आले. ग्यानबुवा रमाईच्या शेजारी खाली बसले व त्यांची काळजी करु लागले. काही वेळानी रमाईनी डोळे उघडले तेंव्हा ग्यानबुवाना बघून रमाईच्या चेह-यावर आनंदाची लकीर उमटली. बुवा आपण कधी आलात असं विचारल्यावर बुवा उत्तर देतात....... आईसाहेब आपली तब्बेत बरी नाही कळल्यावर त्या पांडूरंगाला साकळं घालून लगेच ईकडे धाव घेतली.

“बरं केलात महाराज आपण आलात........... हळू हळू देवाचं भजन म्हणत चला....... तेवढंच देवाचं नाव ऐकून जिवाला बरं वाटेल.”
काही झालं तरी शेवटी धार्मिक पिंड असलेली एक श्रद्धावानी स्त्री होती आमची रमाई. ग्यानबुवाच्या भजनांच्या आवाजात त्या रात्री रमाईचा डोळा लागला. ईकडे बाबासाहेबाना परत बोलावण्याचे काम युद्ध पातळीवर चालू झाले. रात्री बारा नंतर रमाईचं अंग खूप तापल्यासारखं जाणवल्यावर शंकरमामानी थर्मा मिटर लावून पाहिले. ताप १०४ च्या पुढे सरकला होता. लक्ष्मीबाई व घरातील ईतर सदस्यानी कोलन वाटरच्या पट्ट्या ठेवण्याचे काम अखंडपणे चालविले होते. शंकर मामा अधून मधून गोळ्या व औषधी देत होता. ग्यानबुवा अन शिष्यगणांचा नामस्मरणाचा सोहळाही अखंडपणे चालू होता. अन एक अत्यंत महत्वाची घटाना घडते.
रमाई ताडकन उठतात अन सासरे बुवा (रामजी सपकाळ) आले असं बोलू लागतात. त्या म्हणतात, “मामंजी, मी तुम्हाला दिलेला शब्द पाडला बरं का. साहेबाना तुमच्या म्हणन्या प्रमाणे खूप शिकण्यास मदत केली. मी बायको म्हणून त्यांच्या शिक्षणात कधिच अडथळा आणला नाही.  संसाराचा सारा भार मी पेलला अन त्याना मुक्तभरारी घेण्यास वाट दिली. मी त्याना संसारात अडकून ठेवलं नाही. त्याना संसाराची काळजी करु दिली नाही. आता मात्र मी थकले ओ मामंजी. आता या तुमच्या सेवेत येण्याची ईच्छा आहे.”
अत्यंत धार्मिक वृत्तीमुळे  शेवटच्या घडीला असा संवाद होणे वा घडून येणे अगदी शक्य आहे. रमाई ज्या प्रकारच्या धार्मिक होत्या त्यांची देवा प्रती जी श्रद्धा होती ते बघता कोणी स्विकारो वा न स्विकारो पण रमाईचे हे वाक्य मी मात्र स्विकारतो.
पहाटे पाच वाजता शंकरमामा डॉक्टरांकडे गेले. रात्रभर तापात चाललेली बडबड सांगुन लगेच त्याना सोबत घेऊनच मामा घरी आले. डॉक्टरानी परत एकदा रमाईची तपासणी केली व औषध सुरु ठेवायचा सल्ला दिला. जाताना परत एकदा शंकर मामाना डॉक्टर म्हणाले. लवकरात लवकर आंबेडकर साहेबाना बोलवा.  आता मात्र अवसान गळाले. सर्व हतबुद्ध होऊन डॉक्तरांकडे पाहू लागले. बाबासाहेबाना बोलाविण्यासाठी वसईला बातमी धाडली होतीच.  ईकडे रामाई डोळ्यात जिव आणून बाबासाहेबांची वाट बघू लागली. मधेच शंकरमामाना बोलावून रमाई रागावू लागल्या. साहेब आजून का आले नाही याचा जाब विचारुन परत अस्वस्थतेमुळे बेशुद्ध अवस्थेत जाऊ लागल्या. एकंदरीत शेवटच्या घटका सुरु झाल्या होत्या. फक्त बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी तितका जिव अडकून पडला होता.
२६ मे १९३५ रोजी संध्याकाळी दारात मोटारीचा आवाज आला. बाबासाहेबानी वसई वरुन यायला खूप उशीर केला होता. पण रमाईनी मात्र सर्व शक्ती पणाला लावून जिव एकवटून धरला होता. बाबासाहेबाना पाहून रामाईनी चेह-यावर समाधान व्यक्त केले. ज्या व्यक्तीसाठी मागच्या दोन तीन दिवसापासून एवढा त्रास सहन करुन धीर धरला होता ती व्यक्ती आता पुढे उभी होती. बाबासाहेब रमाईच्या बिछान्याच्या शेजारी खुर्ची टाकून बसले व डॉक्टरानी दिलेल्या औषधपाण्याचा डोस घ्यावयास लावला. रमाईची ही अवस्था पाहून त्यानाही भरुन आलं. ते पहिल्यांदा ओक्साबोक्सी रडले. त्याना रडताना पाहून घरातील सर्व सदस्याना अवघडल्यासारखे होत होते. ज्या बाबासाहेबाना देशातील सर्व वृत्तपत्रे लोखंडी काळजाचा निष्ठूर म्हणून उल्लेख करीत त्यांचा हा असा आगळा वेगळा चेहरा बघून सर्व थक्क झाले. आज लोकाना कळलं की आतले बाबासाहेब किती मृदू व हळवे आहेत. बाहेर जे कठोर दिसतात ते परिस्थीतीशी सामना करण्यासाठी सिद्ध झालेले कृत्रीम वा लढवय्ये बाबासाहेब हे खरे बाबासाहेब नसून गरज म्हणून निर्माण झालेले बाबासाहेब होतं. खरे बाबासाहेब तर अत्यंत भावूक, प्रेमळ व हळवे आहेत. पण सनातनी समाजाच्या निर्दयी प्रवॄत्तीला उत्तर देता देता खरे बाबासाहेब कधी बाहेरच आले नाहित. पण आज मात्र ईतक्या दिवस लपून बसलेल्या बाबासाहेबांचं दर्शन घडत होतं. रमाईच्या डोक्यावर व पाठीवरुन हात फिरवीत बाबासाहेबानी ती अख्खी रात्र जागून काढली.
सकाळ झाली तरी बाबासाहेब तिथेच बसुन रमाईला न्याहाळत होते. सर्व जिवन पट झरझर डोळ्यासमोरुन सरकत होते. रमाईनी किती कष्ट उपसून दिवस काढले याचा आढावा डोळ्यापुढे सरकत होतं. ते सर्व आठवून बाबासाहेब अत्यंत भावविवश होतात अन त्यांच्या डोळ्यातून गळालेले अश्रूचे थेंब थेट रमाईच्या चेह-यावर पडतात. रमाई जाग्या होतात व बाबासाहेबांचे अश्रू पाहून त्याही व्याकूळ होतात. तेवढ्यात त्यांच्या छातीत एकदम जोराची कळ येते व त्या ओरडू लागतात. बाबासाहेबानी शंकर मामाला हाक मारली. लक्ष्मी, शंकरमामा, मुकूंद व ग्यानबुवा सकट सगळे धावले. रमाई शेवटच्या घटका मोजू लागल्या. तेवढ्यात बाबासाहेबानी रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. अन अक्ष्मीबाईनी गौराबाईना सांगितलं, “गौराबाई....... रमाला कुंकु लावा........... करंडा तिथेच असेल बघा.......... सुवासीनीचा मान द्यायची वेळ हाय ही.”
गौराबाईनी करंडा घेतला, आधी स्वत:ला कुंकु लावला व नंतर रमाईला कुंकु लावला. बाबासाहेब मात्र रडात होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. रमाईनी आपला एक हात उचलून बाबासाहेबांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. तो हात मधुन खाडकन खाली पडला अन ज्योत मालवली. घड्याळात बरोबर साडेनऊ वाजले होते. दिवस होता २७ मे १९३५. रमाईनी बाबासाहेबांचा निरोप घेतला. या वेळी राजगृहात ज्या किंकाळ्या उठल्या त्या रेखाटना पलिकडच्या आहेत.
--------------------
रमाईच्या निधनाची बातमी वा-या सारखी शहरात पसरली. गिरणी कामगारानी ताबडतोब काम बंद केले. सर्व कामगार राजगृहाकडे धावले. बाबासाहेबांची अवस्था पाहण्यासारखी नव्हतीच. हा हा म्हणता १०,००० च्या वर माणसं जमली. आज राजगृहा समोरा सारा अस्पृश्य समाज पोरका झाल्याच्या भावनेने राजगृहा समोर टाहो फोडत होता. अन ईकडे आत रमाईच्या अंतिम यात्रेची तयारी चालू होती. बाबासाहेब म्हणतात, “रमाला पांढरे पातळ आवडत असे, तीला पांढरे पातळ नेसवा.” काय ती काळजी. अशा अवस्थेतही त्याना बायकोच्या आवडी निवडीचं बरोबर भान होतं. पण लोकानी तसे करण्यास नकार दिला. सौभाग्यवतीला शेवटच्या प्रवासाह हिरवा चुळाच नेसवायचा असतो, अन रमाईचा या प्रवासात हिरव्या चुळ्यावरचा अधिकार बनतोच बनतो. त्यावर बाबासाहेबानी माघार घेतली व हिरवा चुळा नेसविण्यात आला.

राजगृह ते वरळी हिंदू स्मशानभूमी पर्यंत निघालेल्या या प्रेतयात्रेत हजारो बांधव सामिल झाले. स्वत: बाबासाहेब, डॉ. पी. जी. सोळंकी, देवराव नाईक हे एका मोटारीत तर दुस-या मोटारीत त्यांचे खास सहकारी शिवतरकर, कमलाकांत चित्रे, दत्ता प्रधान सारखी मंडळी होती. ईतर तीन-चार मोटारीतून घरची व नात्यातील सर्व मंडळी होती. समता सैनिक दल अफाट जनमुदायाला ओरडून ओरडून वाट देण्याच्या कामात लागला होता. ग्यानबुवा, मडकेबुवा सोबत चालले होते तर चिरंजीव यशवंत हाती शिंकोळी घेऊन रडत रडत पुढे सरकत होते.

प्रेतयात्रा वरळीत पोहचली, अलोट गर्दीमूळे वरळी नगरीत पाय ठेवायला जागा उरली नव्हती. एका बाजूला चिता रचली गेली. दुस-या बाजूला शोकसभा आयोजीत करण्यात आली. या शोकसभेत सर्वप्रथम श्री. देवराव नाईक बोलले. त्या नंतर सिताराम शिवतरकरही बोलले. तेंव्हा रमाईला अगदी जवळून ओळखणारे ग्यानबुवा मधेच बोलले. त्यानी आपल्या भोळ्या भाबळ्या भावना व्यक्त केल्या. तिकडे चिरंजीव यशवंतनी आईच्या चितेला अग्नी दिला. बाबासाहेबानी हंबरडा फोडला व अशा प्रकारे सहजिवनाचा हा  अध्याय ईथे बंद पडतो अन बाबासाहेब या पुढे कायमचे एकाकी पडतात.   

बुधवार, ८ जून, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २४ (गोलमेज तिसरी)


७ नोव्हे १९३२ रोजी बाबासाहेब तिस-या गोलमेजसाठी  व्हिक्टोरीया आगबोटीनी प्रस्थान केले. या प्रवासात कित्येकांशी बाबासाहेबांच्या ओळख्या झाल्या. १७ नोव्हे १९३२ रोजी गोमजेत-३ चे काम सुरु झाले. या परिषदेस गांधी आले नव्हते. त्यामुळे  इतरही सदस्य आले नव्हते. मुसलमान मात्र सर्व मागण्या पदरात पाडुन घेण्यात यशस्वी झाले होते. तरी सुध्दा एक हेल्दी राजकारणाची मागणी करण्यात त्यांचा पुढाकार नव्हता. आलेल्या हिंदु मध्ये सुद्धा उभी फूट जाणवत होती. तसही गोलमेज-३ एवढी महत्वाची नव्हतीच. गोलमेज-१ व गोलमेज-२ मधिल कामाना पुरक अशी पुरवणी जोडणे एवढच काय ते या तिस-या गोलमेजचं काम होतं. काही दुरस्त्या व सुचना करण्यात आल्या. जात, धर्म, जन्मावर आधारलेली बंधने रद्द करावे अशी विनंती करणारे एक निवेदनपत्र बाबासाहेबानी तयार केल. जयकर, सप्रू,जहांगीर इ. नेत्यानी सह्या करुन ते निवेदन ब्रिटिश पंतप्रधानाना सादर केले. अशा प्रकारे २४ डिसे. १९३२ रोजी गोलमेज-३ चे काम संपते.

गुरुवायूर मंदिर प्रवेशाचा घोळ:
या दरम्यान गांधीने एक बॉंब टाकला. त्याचा स्फोट इतका जोरदार होता की देशभरातील गांधीवादी ढोंगांचे बिंग फुटले. गांधी म्हणाले  होते की, गुरुवायूर येथील मंदिरात अस्पृश्याना प्रवेश मिळावा यासाठी आपण उपोषण करणार आहोत  असा गांधीनी आव आणला होता. ही घोषणा करताच सनातनी गांधी अनुयायानी यास विरोध असल्याचे जागो जागो बोलू लागले. पण गांधीपुढे बोलणार कोण? बर गांधीनी हे केलं ते बरच केलं. त्यामुळे त्यांच्या अवती भवती वावरणा-या  मुखवटाधारी लोकांची गणती बाहेर पडली. पण यातील आजुन गमतीचा भाग असा की गांधीनी वरची घोषणा फक्त ही गणती करण्यासाठीच केली होती. त्याना उपोषण वगैरेला बसायचे नव्हतेच मुळी. काही दिवसातच त्याना आपली जुनी घोषणा फिरविणारी दुसरी घोषणा केली. जर पोनाई तालुक्यातील बहुसंख्य स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाच्या मागणीचा विरोध केला तर मी आपली मागणी मागे घेईन. आत्ता बोला. गांधी खरच होते की नाय नालायक. खर तर एवढ्या महान नेत्याला असे शब्द वापरु नये पण आमच्या बद्दल त्यानी वेळो वेळी घेतलेला दुटप्पीपणा पाहता मला त्यांच्यावर या स्थरला जाऊन टिका करण्याचा अधिकारच मिळतो. अस्पृश्यां बद्द्ल गांधीनी सदैव खालच्या थराला जाऊन भूमिका घेतली.  या वेळेस गांधीना उघडं पाडणारी आजून एक घटना घडते. मंदिर प्रवेशा बद्दल लोकांच मत घेण्यात येतं. अन गंमत अशी होते की बहुसंख्य लोकं मंदिर प्रवेशाच्या बाजूनी कौल देतात. आता मात्र गांधीची खरी पंचायत होते. हे सगळं होऊनही अस्पृश्याना मंदिर प्रवेश मिळालेलं नसतं. गांधी आता बोलल्या प्रमाणे कृती करतील या आशेनी उभा अस्पृय समाज गांधीकडे टक लावून पाहू लागला. अन गांधीनी परत एकदा आपला नालायक पण दाखविला. बोलल्या शब्दाला जागणे त्यांच्या गावचंच नव्हतं. त्यानी शब्द न पाळता समस्त स्पृश्यांचा परत एकदा विश्वास घात केला. गोलमेज दोन मधे लवादाचा निर्णय मान्य असेल अशा निवेदनावर सही करणारे गांधी पुण्यात उपोषण करुन आपल्याच शब्दापासुन पलटी मारली होती. आज गुरुवायूर मंदिराच्या बाबतीत त्यानी दुस-यांदा कोलांटी मारली. या गांधीच्या कोलांट्या आता अस्पृश्यांच्या लक्षात येऊ लागल्या.

बाबासाहेब परतले
२३ जाने १९३३ रोजी  गोलमेज-३ चे काम संपवुन गंगा या आगबोटीने बाबासाहेब मुंबईस  परतले. नेहमी प्रमाणे समता दलाने सलामी देऊन बाबासाहेबांचे धक्यावर स्वागत केले. त्या नंतर लगेचच महाराज्यपालानी गोलमेजच्या प्रतिनिधीना अनौपचारिक बैठकिसाठी दिल्लीला बोलाविले.  या बैठकी नंतर बाबासाहेब गांधीना भेटण्यसाठी पुण्यात येतात.
४ फेब्रू. १९३३ रोजी बाबासाहेब गांधीना भेटावयास येरवडा तुरुंगात जातात. गांधीनी क्रृत्रीम हास्यानी बाबासाहेबांचं स्वागत केलं अन इतर घडामोडींवर बरीच चर्चा रंगते. हे सगळं झाल्यावर मुख्य मुद्याला हात घालत गांधी म्हणतत की, डॉ. माझी तुम्हास अशी विनंती आहे की आपण डॉ. सुब्बारायन व रंगा अय्यर यांच्या मंदिरप्रवेशाच्या विधेयकाला पाठींबा दयावा. या भेटीत हा मुद्दा येणार याची बाबासाहेबाना खात्री होती. त्यानी नेहमी प्रमाणे गांधीच राष्ट्रीय नेत्याचा आव आणणारी प्रतिमा मोडित काढणारी भीम गर्जना केली. रंगा अय्यरांच्या विधेयकाला पाठींबा देण मला कदापी जमणार नाही. कारण या विधेयक अस्पृश्यांच्या अधिकारा बद्दल स्पष्टमत दर्शवीत नाही. सार्वमत झाल्यास अस्पृश्याना मंदिर प्रवेश मिळावा एवढेच दिले आहे. पण त्याना देव दर्शन, त्या मुर्तीची पुजा व स्पर्श या संबंधात या विधेयकानी मौन पाळले आहे. त्यामुळे रंगा अय्यरांचं विधेयक अपुर्ण व दलितांवर अत्याचार करणारं आहे. म्हणुन याला माझा कद्यापी पाठिंबा मिळणार नाही.
गांधीची मला कित्येक वेळा कीव येते. त्याना बाबासाहेब म्हणजे दुधखुळे वाटले होते की काय कोण जाणे. जमेत तितक्या वेळा त्यानी बाबासाहेबांची तटबंदी करण्याचे सर्व युक्त्या आजमावल्या. प्रत्येक वेळी बाबासाहेब त्याना पुरुन उरत तरी सुध्दा तेच रडीचं गाणं. तिकडे नाशिकचे काळाराम मंदिर सत्याग्रह मागच्या साडेतीन चार वर्षापासुन चालू होते. दर वर्षी राम नवमीला मंदिर सत्याग्रह जोर धरत असे.

रंगा अय्यर विधेयकावर निवेदन
१२ फेब्रु १९३३ रोजी बाबासाहेबानी मंदिर प्रवेशाच्या विधेयका संबंधी आपले  निवेदन जाहिर केले. ते म्हणाले, या विधेयकाला अस्पृश्य लोकांचा पाठिंबा नाही. कारण या विधेयकानी मंदिर प्रवेशाचा निर्णय लोकमतावर अवलंबुन ठेवले आहे. अन अस्पृश्यतेला पाप मानत नाही. भलेही माझ्या अस्पृश्य बांधवाना अस्पृश्यता व गुलामी याची जाणीव नसेल. ते मुकाट्याने ही अस्पृश्यता स्विकारुन जगत असतील पण याचा अर्थ ते सुसाह्य आहे असा कदापी नाही. अन याच गोष्टी रंगा अय्यराच्या विधेयकात अधोरेखीत होत नसल्याने  या विधेयकास माझा पाठिंबा नाही.
या निवेदनाची एक प्रत येरवड्यात पाठवून दिली. गांधींनी परत एकदा आगपाखड केली. बाबासाहेबानी गांधीना एक प्रश्न टाकला. मंदिर प्रवेशाचा प्रश मिटल्यावर आम्ही जेंव्हा जाती निर्मुलनाचा व चातुर्वण्य उच्चाटनाचा प्रश्न हाती घेऊ तेंव्हा तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहाला? आमच्या की सनातन्यांच्या? जर उदया तुम्ही  आमच्या पुढे शत्रू म्हणुन उभे ठाकणार असाल तर मग आज उगीच मैत्रीचं सोंग का म्हणुन करायचं?
याच दरम्याना बाबासाहेब बोलू लागले की हिंदु धर्म माझं मानसिक समाधान करु शकत नाही. मला आता या धर्माची आसक्ती तर राहिली नाहिच पण हिंदु म्हणवुन घेताना सुद्धा संकोच भवाना उचल खातात.

हरिजन साप्ताहिक
११ फेब्रू १९३३ रोजी गांधीनी आजुन एक फासा टाकला. अस्पृश्याचा खरा नेता मीच आहे असा पुरावा उभा करण्याच्या हेतूने अन बाबासाहेबाना वेळ प्रसंगी अस्पृश्यांपासुन दुर करण्याच्या सुळ बुद्धिने गांधीनी हरिजन नावाचा साप्ताहिक सुरु केला.   आपल्या साप्ताहिकाच्या पहिल्याच अंकात गांधीनी आपली लायकी दाखविली. ते म्हणतात, अस्पृश्यता पाळणे हे पाप असले तरी जाती व्यवस्था राखणे हे पाप नाही. १३ फेब्रू. १९३३ रोजी राजगोपालाचारी याना लिहलेल्या पत्रात ते म्हणतात की बाबासाहेबांसोबत झालेली मुलाखत असमाधानकारक राहिली पण मी त्याना आता चांगलं ओळखू लागलो. गांधीनी हरिजन नावानी सुरु केलेली ही रणनीती अस्पृश्यांना अंधारात ढकलणारी होती. पण बाबासाहेबांचा समाज जागरुक झाला होता. त्यानी गांधीच्या असल्या फसव्या गोष्टीना कौल दिला नाही किंवा तिकडे आकृष्ट होऊन बाबासाहेबांपुढे अडचण निर्माण होईल असे वागलेही नाही.

राज्यघटना जाहीर:
मार्च १९३३ मधे राज्यघटना जाहीर करणारी श्वेतपत्रीका ब्रिटिश सरकारने प्रसिद्ध केली. भारतातील जवळ जवळ सर्वच राजकीय पुढा-यानी या श्वेतपत्रीकेचा निषेध केला. सर्वच पक्ष असमाधानी व नाराजीच्या सुरानी बोलू लागले. संयुक्तसमीतीवर लोकांची निवड झाली. जयकर, मिर्झा, आगाखान व सर अकबर यांच्या समवेत बाबासाहेबांची या समितीवर निवड झाली. निवड झालेली सर्व सभासद मंडळी लवकरच लंडनला रवाना होणार होती. त्या आधी बाबासाहेबानी जागो जागी जंगी सभा घेतल्या.  याच दरम्याना बाबासाहेबांच्या पुढे एक अडचण उभी ठाकते. पनवेल येथे एका ज्यू च्या घरात बाबासाहे अस्पृश्यांसाठी एक वसती गृह चालवित. पण सनातन्यानी त्या ज्यू चे कान भरले व त्यानी त्रास दयायला सुरुवात केली.  समितीच्या कामावर निघण्यापुर्वी आगाखानना विनंती करुन त्यांच्या  ठाण्यातील बंगल्यात हे वसतीगृह ४ एप्रिल १९३३ रोजी हलविण्यात आले.

संयुक्त समितीच्या कामासाठी लंडनला रवाना:
२४ एप्रिल १९३३ रोजी बाबासाहेब संयुक्त समितीच्या कामासाठी लंडनला रवाना होतात. ६ मे १९३३ रोजी बाबासाहेब लंडनला पोहचतात. श्वेतपत्रीकेच्या उणिवा दाखविण्यासाठी एक समिती नेमली. या परिषदेत बाबासाहेब म्हणतात, मी निराशजनक स्थितीत सापडल्यामुळे स्वतंत्र मतदार संघ मागितला. जर स्पृश्य हिंदुनी एकसंघ राहण्यासाठी अस्पृश्यांसी माणूसकिने वागण्याचे ठरविले तर अस्पृश्य समाज त्यांच्या पाठिशी राहिल.  या भाषणानी राजा-मुंजे करार घडवून आणणारे मुंजे ईतके भारावून जातात की त्यानी बाबासाहेबाना थेट हिंदु महासभेचे अध्यक्षपद देऊ केले.  बाबासाहेबानी चर्चिल साहेबांच्या लोकसभेतील भाषणाचा धागा धरून एक भाषण दिले. चर्चिल साहेबाना त्यांच्याच घरात घुसून सळो की पळो करणारे हे भाषण एक अत्यंत महत्वाचे भाषण ठरले. नोव्हे १९३३ ला शेवटी समितीचे काम संपते.  ८ जाने १९३४ रोजी बाबासाहेब मुंबईस परत येतात. संयुक्त समितीचे काम समाधानकार झाले याची चिन्हे त्यांच्या आनंदी चिह-यावर उमटलेली दिसतं.  काम फत्ते झाल्याचा आनंद बाबासाहेबाना लपविता येईना.


विश्रांती
१९३० ते १९३४ पर्यंत सतत काम केल्यामुळे आता बाबासाहेबाना विश्रांतीची नितांत गरज होती. जे जे करायला पाहिजे ते सर्व बाबासाहेबानी केले होते. आता अंतिम निकाल आल्यावर परत लढा देण्यास सज्ज व्हायचे होते. तत्पुर्वी थोडी विश्रांती गरजेची होती. मार्च १९३४ मधे बाबासाहेब बोर्डी येथे विश्रांती घेण्यासाठी गेले. येथे त्यानी आयुर्वेदिक उपाचर वगैरे घेतला. मे १९३४ च्या दरम्यान कोल्हापूर नजीक पन्हाळ गडावर बाबासाहेब विश्रांती घेतात. येथील वास्तव्यात बाबासाहेब अगदी ताजे तवाने होऊन निघतात. दत्तोबानी बजावलेली चोख व्यवस्था त्याना आवडते. त्या नंतर ते मुंबईस परततात.

राजगृह
याच दरम्याना बाबासाहेबाना आपल्या ग्रंथासाठी एक बंगला बांधण्याची ईच्छा झाली. दादरच्या हिंदु  कॉलनीत बाबासाहेबानी एक भव्य बंगला बांधला. हे घर बांधण्यासाठी त्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं वाढलं पण त्यांच्या आवडत्या ग्रंथाना मात्र एक डौलदार जागा लाभली. खालच्या मजल्यावर कुटूंब राहात असे तर वरच्या मजल्यावर बाबासाहेब आपल्या ग्रंथासमवेत वेळ घालवित असत.
या कालावधित बाबासाहेबानी आपल्या वकिली व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. त्याच दरम्यान दौलताबदला त्यांचा तेजोभंग करणारी एक घटना घड्ते. तळ्याचे पाणि बाटविल्याचा ओरडा करुन दौलताबादेतील मुसलमान अंगावर धावतात. तेंव्हा मी जर ईस्लाम स्विकारला तर हे तळे बाटले नसते ना.. मग तुझ्या धर्माची शिकवण तु पाळतोय का? असा प्रतिप्रश्न करुन वाद मिटविला.
याच साली डिसेंबर १९३४  मधे बाबासाहेब सिंहगडावर आराम करत असताना एके दिवशी जवळपासचे सनातनी हातात लाठ्या काठ्या घेऊन गडावर येतात. बाबासाहेबांच्या अंगावर कित्येका जण धावून जातात. गड बाटविल्याचा आरोप ठेवून बाबासाहेबांचा अपमन केला जातो. परंतु बाबासाहेबानी हा भ्याड व बिनबुडाच्या लोकांचा ह्ल्ला नुसतं शब्दाच्या धारेनी परतवुन लावला.

संयुक्त समितीचे प्रतिवृत्त प्रसिद्ध झाले
याच दरम्यान संयुक्त समितीचे प्रतिवृत्त प्रसिद्ध झाले १९ डिसे १९३४ रोजी भारतीय राज्यघटनेचे विधेयक ब्रिटिश लोकसभेत विचारासाठी मांड्ण्यात आले. बाबासाहेबांनी या समितीच्या प्रतिवृत्ताचा निषेध नोंदविला.  हे प्रतिवृत्त प्रतिगामी व भारताच्या प्रगतीस बाधा ठरणार असल्याचे बोलून नाराजी व्यक्त केली. तिकडे ब्रिटिश लोकसभेत संयुक्त समितीच्या सुचनेनूसार तयार केलेल्याभारत विधेयक यावर सभासदांची तुडुंब जुंपली जाई. ए. डब्ल्यू गुडमॅन या हुज्रूरपक्षीय सभासदानी सभागृहात एक स्फोटक व अस्पृश्यांच्या बाजुने जाणारं वक्तव्य केलं. अस्पृश्याना मिळणारं प्रतिनिधित्व दोन्ही मध्यवर्ती व प्रांतिक या विधीमंडळात अपूरं व अन्यायकारक आहे, त्याना जादा अधिकार मिळायला पाहिजे. अन  बाबासाहेब मात्र या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून होते. 
  


डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २३ (पुणे करार)


गोलमेज-२ संपल्यावर बाबासाहेब भारतात न येता अमेरीकेस जातात. तिथे काही महत्वाची कामं पार पाडुन ४ जानेवारी १९३२ लंडनला परत येतात. आठवडाभर लंडनमधे थांबुन १५ जाने १९३२ रोजी भारतास रवाना होतात. बाबासाहेब लंडहुन निघतानाच शिवतरकराना मुंबईत पोहचण्याची तारिख कळवतात. बाबासाहेबांच्या स्वागतासाठी ईकडे मुंबईत अस्पृश्यानी जंगी तयारी चालु केली. आज आपला अनभिषिक्त राजा येणार अन ते ही गोलमेज-२ मधे कित्येक आघाड्यावर मर्दुमकी गाजवून  येत होता. दलितांची बाजू भक्कम करुन शत्रूच्या गोटात शिरून आपल्या लोकांसाठी कित्येक अधिकार  खेचुन आणण्याचा पराक्रम गाजविला होता. नुसतं पराक्रमच नव्हे तर वेळ प्रसंगी अत्यंत चालाखिने ब्रिटिशांशी खलबते केलीत. पत्रकाराना जमेल तितकं वापरुन त्यांची शक्ती आपल्या लोकांच्या कामी लावली. चलाखी व राजनितीक मुत्सद्दीपणाच्या सर्व कसोट्य़ा वापरल्या. बाबासाहेबांच्या आतमधिल राजकिय पुरूष गांधीमधल्या खलपुरुषाला कित्येक वेळा उघडे पाडतो. दलितांचा बाप म्हणुन आपल्या लेकराना जास्तीत जास्त अधिकार मिळवुन देताना बाबासाहेबांमधिल विद्वान अत्यंत मुद्देसुद अन तर्कसुसंगत वाद करतो व वस्तुनिष्ठ परिस्थीती अचुक मांडतो. अशा प्रकारे सर्व शक्ती एकवटून गोलमेज-२ मधे आमचा बाप म्हणुन कर्तव्य बजावताना लेकरांसाठी अतूल्य कामगिरी करणारा महाबली आज भारतात येत होता. २९ जाने १९३२ रोजी बाबासाहेब मुंबईच्या बंदरात पाय ठेवतात. एक दिवसा आधीपासुन तिथे जमलेल्या सर्व भीमपुत्रानी गगनभेदी आरोळ्यानी बाबासाहेबांचं जंगी स्वागत केलं. समता सैनिक दलानी आपल्या राजाला मानवंदना दिली व भायखळा मार्गे परळ पर्यंत बाबासाहेबांची मिरवणुक काढण्यात येते. त्या नंतर जागो जागी बाबासाहेबांचा सत्कार व मानपत्र देऊन त्यांच्या गोलमेजच्या कार्याबद्दल अस्पृश्य संघटनानी आभार मानले.

लोथियन समिती: (मताधिकार समिती)
बाबासाहेब गोलमेज-२ मधे ब-याच मागण्या मागुन आलेत पण त्यातिल अत्यंत महत्वाची मागणि होती ती म्हणजे राजकीय अस्तित्व मिळविण्याची. बाबासाहेबानी अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी मतदानाचा अधिकार मागितला होता. खरं ते फक्त बाबासाहेबानीच हे मागितलं नव्हतं. शिख, मुसलमान, ख्रिश्चन व इतर अल्पसंख्यांक  लोकानीही याच मागण्या मागितल्या होत्या. पण गांधीनी इतरांसाठी वरिल मागण्या देण्याचे कबूल करताना त्याच मागण्या अस्पृश्याना मात्र नकारल्या. गांधीच्या अशा अनेक गूढ प्रकरणांचा एकंदरीत परिणाम असा झाला की राजकिय मागण्या मान्य करण्याआधी भारतातील अस्पृश्य लोकांची खरी परिस्थीती काय आहे हे जाणुन घेण्यासाठी लंडनहून एक समिती भारतात येते. त्या समितीचे अध्यक्ष  लॉर्ड लोथियन होते, म्हणुन त्या समितीचे नावलोथियन समिती पडले. लोथियन समिती देशभर फिरून अस्पृश्यांची पाहणी करणार होती. त्यांच्या मागण्या व ईतर गोष्टींचा वृत्तांत लंड्नला पाठविल्यावर मतदानाचा अधिकार देण्याचे ठरविले जाणार होते. या कामात बाबासाहेब स्वत: जातीने भाग घेण्यासाठी लगेच दिल्लीत हाजर होतात. लोथियन समिती सोबत त्यानी देशभर दौरा केला. जागो जागी लोथियन समिती व बाबासाहेबांचे जंगी स्वागत केले जाते. भारतातील कानाकोप-यातील अस्पृश्यानी समितीपुढे बाबासाहेब आमचे एकमेव अन बिनविरोध नेते असल्याच्या भीमगर्जना करुन लोथियन साहेबांना भंडावुन सोडले. संयुक्त मतदार संघाचा सर्व देशातून अस्पृश्य संघटनानि विरोध नोंदविला. स्वतंत्र मतदार संघ मिळावा याची जागो जागी मागणी करण्यात आली अन दुहेरी मतदानाचा अधिकार मागण्यात आला.

राजा-मुंजे करार (फितूरी आपल्याच माणसाची)
बाबासाहेब जीवाचं रान करुन जेंव्हा लोथियन समिती सोबत देशाचा दौरा करुन स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करित होते तेंव्हा एक अत्यंत महत्वाचा अस्पृश्य नेता फोडण्यात हिंदु महासभा यशस्वी होते.  सावरकरांच्या प्रभावाखाली चालणारी हिंदु महासभा त्या काळात बाबासाहेबांच्या बाजूनी होती असे ब-याच ठिकाणी जाणवते. पण डॉ. मुंज्यानी मात्र यावर बोट उचलण्यास भाग पाडणारी फितूरी घडवून आणली. जेंव्हा बाबासाहेब गोलमेज-२ गाजवत होते तेंव्हा गांधीच्या मीच एकमेव अस्प्रुश्यांचा नेता आहे या विधानावर सडेतोड उत्तर देण्यासाठी ज्या राजानी ईकडे भारतात रान पेटवुन दिले अन बाबासाहेब हे एकमेव अस्पूश्यांचे नेते असल्यांचा तारांचा वर्षाव पाडून गांधीचे मुखवटे फाडले अशा कर्तव्यनिष्ठ राजाला आज मुंज्यानी फोडुन बाबासाहेबांच्या पवित्र कामात विघ्न उभे केले. या सर्व घडामोडींच्या मागे सावरकरांचा हात होता हे निर्विवाद सत्य आहे. आज पर्यंत जो राजा अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ मिळावा असे म्हणत होता त्यानी अचानक आपला पवित्रा बदलला अन अस्पूश्याना संयुक्त मतदार संघ व राखीव जागा मिळाव्यात अशी मागणी करण्याचा करार फेब्रुवारी १९३२ मधे मुंज्यांशी केला. यालाच राजा-मुंजे करार म्हणतात. हा प्रकार ऐकुन बाबासाहेब मात्र अत्यंत अस्वस्थ होतात, क्रोधीत होऊन हिंदु महासभेच्या कूननितीचा निषेध नोंदवितात. पण ईकडे सावरकर अन मुंजे मात्र संघटना फोडल्यामुळे आनंद साजरा करतात. सावरकरानी अस्पृश्यनिवारणाचे काम चालविल्याचा इतिहास आहे. पण त्यामागची भूमिका काय होती कोणी तपासुन पाहिले नाही. खोलात गेल्यावर हे कळते की बाबासाहेबांच्या कामात विघ्न निर्माण करण्यासाठी काही अस्पृश्य नेते सोबत असणे गरजेचे होते. त्यामुळे सावरकर अस्पृश्य निवारणाचा आव आणत. या करारा नंतर लगेच राजानी ब्रिटिश पंतप्रधानाना तार करुन कळविले की बाबासाहेब हे सर्व अस्पृश्यांचे नेते नसून ते एका लहानशा गटाचे नेते आहेत. ईकडे बाबासाहेब समिती सोबत व्यस्त होते.
राजा-मुंजे कराराची लाट देशभर उसळली. पुर्वेकडील सर्व अस्पृश्य नेत्यानी या कराराचा निषेध केला. सावरकरांची कूटनिती उघड झाली. बाबासाहेब मात्र मताधिकार समिती सोबत काम करण्यात गढून गेले होते. राजानी नसता उपद्रव करुन बाबासाहेबांचा ताप वाढवून ठेवला होता. याच वेळी तिकडे नाशिकची चळवळ जोर धरते अन भाऊराव गायकवाड व रणखांबे याना अटक होते. अशा प्रकारे अनेक अडचणीना तोंड देत बाबासाहेब आपला लढा चालवित होते. याच दरम्यान भारतातील खास करुन पुर्व भारतातील अस्पृश्यानी अनेक परिषदा भरवुन बाबासाहेबाना पाठींबा दिला. १ मे १९३२ रोजी लोथियन समितीचे काम संपले. समितीचे इतर सदस्य निघुन गेले पण बाबासाहेब मात्र आपले एक स्वतंत्र निवेदन सादर करण्याच्या हेतूने तिथेच (सिमल्याला) थांबले होते. त्या निवेदनाचा प्रभाव असा पडला की डिप्रेस्ड क्लास म्हणजे अस्पृश्य  अशी नवीन व्याख्या लोथियन साहेबाना मान्य करावी लागली. आता पर्यंत अस्पृश्य म्हणजे गुन्हेगारी लोकं, भटके जमाती, वन्यजाती व आदिवासी असा साधारण समज होता. पण बाबासाहेबांच्या निवेदनांचा व तर्कसुसंगत अन अभ्यासपुर्ण मांडणीची फलश्रूती म्हणजेच लोथियन साहेबांनी स्विकारलेली वरील नवीन व्याख्या. हा बाबासाहेबांचा एक महत्वाचा विजय होता.  आता लोथियन साहेबानाही तिकडे ब्रिटनला जाऊन हे सगळं सांगताना सोपं जाणार होतं.
हे काम संपवुन बाबासाहेब मुंबईला परततात. दोन दिवस आराम करुन लगेच ६ मे १९३२ रोजी नागपूर जवळील कामटी येथे भरविण्यात येणा-या डिप्रेस्ड क्लासच्या परिषदेस हाजर राहतात. बाबासाहेबांसारख्या महान नेत्याला आमच्या दलित लोकानी ईथे स्टेशनवर काळे झेंडे दाखवून विरोध दर्शविला होता. हे सगळे काळे झेंडे दाखविणारे दलित राजा-मुंजे समर्थक होते. हि अत्यंत लाजीरवाणी गोश्ट होती की बाबासाहेब ज्या दलितांसाठी लढत होते त्यांच्यातूनच काही गटातील लोकानी बाबासाहेबांचा निषेध केला होता. बाबासाहेब परिषदेच्या ठिकाणी पोहचतात. १५-२० हजार लोकानी मंडप भरलेले होते. लोकांच्या अलोट गर्दिपुढे बाबासाहेबांचे एक अत्यंत महत्वाचे अन आत्मसन्मान जागृत करणारे भाषण होते.  या परिषदेत दलित नेते गवई याना बाबासाहेबांच्या विरोधात न जाण्याची तंबी देण्यात येते. ज्यामुळे संतापून गवई साहेबानी लिथियन साहेबांकडे तक्रार दाखल केली. राजभॊजनी सुद्धा घोळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याना सुद्धा परिषदेतुन बाहेर काढण्यात आले. अशा प्रकारे ज्या ज्या नेत्यानी कॉंगेस व हिंदु महासभेच्या प्रभावाखाली फितूरी करण्याचे काम केले त्याना धडा शिकविण्यात आला. अशा प्रकारे हि परिषद वादावादीची व दगाबाजाना धडशिकविणारी ठरते.
अस्पृश्य नेत्यांनी केलेल्या एकंदरीत फितूरीमुळे लोथियन साहेबांचे मतपरिवर्तन होऊन आपल्या मागण्या मान्य करताना अस्पृश्यांवर अन्याय होऊ नये म्हणुन बाबासाहेब आता थेट लंडन गाठण्याची तयारी करतात. लोथियन समितीजे सादर करील त्यावरुन आपल्यावर अन्याय होता कामा नये अन फितूरांचं फावल्यास समाजाची हानी भरुन निघणार नाही. म्हणुन निर्णय येण्या आधीच तिथे धडकण्यासाठी बाबासाहेब २६ मे १९३२ रोजी लंडनला रवाना होतात. आयुष्यात अशी संधी परत परत येणार नाही. काय करायचे ते आत्ताच करायचे हे बाबासाहेब जाणून होते. जुनच्या पहिल्या आठवड्यात बाबासाहेब लंडनला पोहचतात. तिथे कित्येक महत्वाच्या व्यक्तीना भेटून आपले मत मांडतात. अस्पृश्याना जास्तीत जास्त सवलती देणे कसे गरजेचे आहे हे समजावून सांगतात. त्यानी लहानात लहानापासुन मोठ्यात मोठ्या लोकांच्या भेटी घेतल्या. एक स्वतंत्र निवेदन तयार केले अन ब्रिटिश पंतप्रधानाना ते सादर केले. १४ जुन पर्यंत काम फत्ते करुन बाबासाहेब जर्मनीला निघून जातत.  याद दरम्यान त्यांची प्रकृती बिघडते. त्यामुळे त्यानी जर्मनितील ड्रेसडेन येथिल डॉ. मोलर यांच्याकडे उपचार नि विश्रांती घेतली. वेळप्रसंगी ब्रिटनला धावता येण्यासाठी हा मुक्काम अचुक होता. पुर्ण जुलै महिना ते जर्मनीत विश्रांती घेतात व  ऑगस्ट मधे भारतात येण्यास निघतात. 

मताधिकाराचा निवाडा जाहीर झाला
बाबासाहेब मुंबईच्या प्रवासात होते. तिकडे भारतापासून हजारो मैल दूर ब्रिटनमधे अस्पृश्यांच्या मताधिकार व इतर मागण्यावर निर्णय घेण्यात आला. १४ ऑगस्ट १९३२ रोजी ब्रिटनचे पंतप्रधान अल्पसंख्यांक प्रश्नावर आपला निवाडा जाहीर करतात. या निवाड्या प्रमाणे अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ बहाल करण्यात आले होते. आता अस्पृश्य जनता आपला माणूस निवडून आणू शकत होती.  त्याच बरोबर स्पृश्य हिंदूच्या प्रतिनिधीच्या निवडनुकीत मतदान करुन आपला हक्क बजावण्याचा दुहेरी अधिकारही बहाल करण्यात आला होता. आज सोनियाचा दिनू होता. भारतभर जल्लोषाचं वातवरण होतं, पण ज्या माणसानी हे मिळविण्यास अत्य़ंत कष्ट उपसले तो दूर समूद्रात भारताच्या दिशेनी प्रवासात होता. १७ ऑगस्ट १९३२ ला बाबासाहेब मुंबईस पोहचतात. या निवाड्यामुळे अस्पृश्य वर्गामधे नवचैतन्याची लाट उसळते. आता नव्या दिशा त्याना खुणावू लागल्या होत्या. प्रगतीचे नवे पथ समोर दिसू लागले. राजकीय हक्क बजावण्यासाठी ब्रिटिशानी दिलेली संधी अतूल्य अन अमूल्य होती. आज पर्यंत दास्यात खितपत पडलेला समाज आता धन्याच्या बरोबरीत येऊन ठेपला होता. सरकार दरबारी अस्पृश्यांची वर्णी लागणार होती. ज्या सनातन्यानी आजवर कुत्र्यापेक्षा वाईट वागविले त्यांचा बरोबरीचा मान सन्मान बहाल झाला होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. जल्लोष चालू होता. देशाच्या कानाकोप-यातील दलित आनंदाने भारावून गेला होता. या सर्व धामधूमीत मग्न झालेला दलित येणा-या वादळी संकटापासून अनभिज्ञ होता. या जल्लोषाला नजर लागली होती.
उभा समाज सर्वत्र आनंदात न्हाऊन निघत असताना भारताच्या पश्चिम भागात पुणे नावाच्या शहरात गांधी नावाचा इसम ज्याला लोकं महात्मा म्हणत त्यानी या सर्व आनंदावर विरजण घालण्यासाठी एक अत्यंत क्रुर व निष्ठुर आक्रमणाची तयारी सुरु केली. अस्पृश्यांचं राजकीय अस्तित्व उदयास येण्या आधीच त्याला ठेचण्याचा आराखडा पुण्यातील येरवडा तुरुंगात आकार घेऊ लागला. सर्व शक्ती झोकून देऊन दलितांचा नवे सर्व अधिकार विसर्जीत करुन त्याना परत गुलाम म्हणुन वागविण्याची गांधीनी जणु शपथच घेतली होती. आपली पुर्ण ताकत झोकून दलितांच्या अस्तित्वावर घाला घाण्यास आता गांधी सज्ज झाला होता. अस्पृश्याना मिळालेले स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी मतदानाचे अधिकार हे ब्रिटिशानी दिलेले कवच कुंडल काढून घेण्यासाठी गांधीनी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत शक्तीशाली असे ब्राह्मास्त्र म्हणजेच आमरण उपोषण उपसले. हे अस्त्र ईतके प्रभावी होते की दलितांची उभी जमात यात भस्म झाली असती. या उपोषणात गांधीचा मृत्यू झाल्यास देशात रक्ताचे पाट वाहिले असते अन मृत्यु न झाल्यास ती कवच कुंडले गांधी पळवुन नेणार होता. एकंदरीत काय तर गांधीने अत्यंत शक्तीशाली अस्त्र सोडण्याचे जाहिर केले. आज पर्यंतचे बाबासाहेबांचे सर्व कष्ट मातीस मिसळणार होते. पर्यायही नव्हता. दलितांच्या विरोधातील उघड उघड घेतलेली हि गांधीची भूमीका समस्त मानव जातीला लाजविणारी होती. बर हे स्वतंत्र मतदार संघ फक्त दलितानाच मिळाले होते अशातला भाग नव्हता. मुसलमान, शीख, ख्रिश्चन याना सुद्धा स्वतंत्र मतदार संघ मिळाले होते. पण गांधीना इतरांचे मतदार संघ मान्य होते. त्यानी देशाला धोका नव्हता. पण दलितांचे मतदार संघ मात्र गांधीना नको होते. यावरुन दिसेल की गांधी किती जातीवादी व अस्पृश्य द्वेष्टा होता. त्याना सरळ सरळ दोन समाजात मतभेद केला होता. मुसलमान व शीखाना मिळालेल्या स्वतंत्र मतदार संघाला समर्थन दिले होते तर फक्त अन फक्त दलितांचा अधिकार मात्र त्यांच्या डोळ्यात खुपू लागला. जातीयवादी संस्कारात ज्याची जडण घड्ण होते त्याच्या बुद्दीच्या मर्यादा अशा प्रकारे सिद्ध होतात. गांधीमधील महात्मा आज गळुन पडला व जातियवादी पुरुष जगापुढे आला. ज्या स्वतंत्र मतदार संघामुळे मुसलमान सारख्या समाजाकडुन गांधीला कुठलाच धोखा वा देशातील लोकामधे पडणारी फूट दिसली नाही ती दलितांच्या बाबतीत मात्र दिसली. गांधीच्या या दृष्टीकोनानी हे जगजाहिर झाले की गांधीची वैचारीक क्षमता फारच कुचकामी व मर्यादीत आहे.
गांधीजी लवकरच उपोषणास बसणार आहेत हि बातमी हांहां म्हणता देशभर पसरली. सगळीकडे गांधीवादयानी अस्पृश्यांवर दबाव आणणे सुरु केले. दलितानी आपले सर्व अधिकार विसर्जीत करुन गांधी देतील ते अधिकार स्विकारावे असा पवित्रा सगळ्या सवर्णानी घेतला. अस्पृश्य समाज मात्र हताश होऊन कात्रीत सापडलेल्या बाबासाहेबांकडे खिन्न व छिन्न विछिन्न झालेल्या भावनानी बघू लागला. या वेळेस गांधीनी बाबासाहेबाना अशा खिंडीत गाठले होते जिथे विजय अशक्यप्राय होते. पराजय मात्र अटळ होता. गांधीच्या या अमानवी, निर्दयी अन निष्ठूरपणाचा निषेध करावा तेवढा कमीच.

उपोषणापुर्वीची परिषद
१९ सप्टे १९३२ रोजी इंडियन मर्चंट चेंबर, मुंबई येथे अत्यंत तप्त वातावरणात एक सभा घेण्यात येते. पंडित मदन मोहन मालवीय हे अध्यक्षपद भूषवितात. मनू सुभेदार, सर चिमणलाल सेटलवाड, वालचंद हिराचंद, राजेंद्रप्रसाद, कमला नेहरु,सर तेजबहाद्दूर सप्रू, छोटीराम गिडवानी, ठक्करबाप्पा, डॉ. देशमुख, डॉ. सावरकर, माधवराव अणे, के. नटराजन, पी. बाळू, पंडित कुंझरू, स्वामी सत्यानंद, एन. शिवराज, असे एकसे बढकर एक लोकं या सभेस हजर असतात. त्या मानाने बाबासाहेब हे रंजल्या गांजल्यांचे नेते. वरुन प्रश्न गांधीच्या विरोधात जाण्याचा असल्यामुळे वातावरण तापलेले होते. सर्व गांधीवादी नेत्यांची नजर बाबासाहेबाना खाऊ कि गिळू म्हणत होती. तेवढ्यात वालचंद हिराचंद यानी बाबासाहेबानी आपले मत मांडावे अशी अध्यक्षाना विनंती केली.

बाबासाहेब उभे होतात अन अत्यंत संयम व विद्वत्तपुर्वक आपले विचार मांडतात. ते म्हणतात,गांधीजीनी अस्पृश्यांच्या हिताविरोधात प्राणांकित उपोषण करणे खेदाची गोष्ट आहे. हेच उपोषण त्यानी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात केले असते तर त्यांचं महात्म्य अधिक उंचावलं असतं. गांधीनी नुसतच उपोषण जाहिर करुन माझ्यावर संकट ओढविले आहे. त्यानी बदली योजना सुचविल्या शिवाय प्रसंगातून मार्ग काढणे अशक्य आहे. मी अत्यंत कष्टाने मिळविलेले हे अधिकार नुसतचं गांधीच्या धाकामुळे पाण्यात सोडण्यास कधीच तयार होणार नाही. मग तुम्ही माझे प्राण घेतले तरी बेहत्तर. तुम्ही बदली योजना गांधींकडुन आणावे मग विचार करया येईल.
मर्द कशाला म्हणतात ते जर बघायचे असेल ना अडचणीत सापडलेले बाबासाहेब बघावे. शत्रूच्या गोटात घुसुन परिस्थीतीच्या नजरेस नजर भिडवून निर्भेडपणे गरजणारा महाबली शत्रूला नुसतं आवाजाने गारद करत असे. आपला मनसुबा जाहिर करण्याचा त्यांचा हा बाणेदारपणा अन आतील मर्दानकीचा हा दणकटपा त्यांच्यातुन ओसंडून वाहताना दिसतो. शत्रू कितीही बळकट व बलवान असला तरी बाबासाहेब दंड थोपटताना जो आत्मविश्वास व निर्भेडपणा दाखवायचे त्यामूळे शत्रू चरकून जाई. लढण्यापेक्षा ईथे समेटच बरे असा शत्रूचा विचारपरिवर्तन होई. बदली योजने शिवाय समेट नाही या भीम गर्जनेने गांधीवादी चरकले. धावाधाव झाली. नेते मुंबई वरुन पुण्या पर्यंत धावले. नुसती धावपळ व धांधल चालू झाली. सगळ्य़ांची तारांबळ उडाली. बाबासाहेब असं काही करतील याचा अंदाज नव्हता. समेट घडविण्याच्या सा-या फुशारक्या बाबासाहेबानी उडवून लावल्या होत्या. मोठ मोठाले नेते म्हणून मिरविण्याचा ज्याना गर्व होता ते पार भूईसपाट झाले होते. सर्व नेत्यानी अवाक होऊन बाबासाहेबांच्या पुढे लोटांगण घालून गांधीपर्यंत धाव घेतली. बाबासाहेब मात्र शांत नजरेनी उडालेला गोंधळ न्याहाळत होते.
पुण्यात गांधीची भेट घेऊन एक शिष्टमंडळ मुंबईस परत येते. दुस-या दिवशी परत परिषद भरते तेंव्हा ते शिष्टमंडळ सांगते की, अस्पृश्याना राखीव जागा देण्यास गांधीची हरकत नाही.
हे ऐकुन बाबासाहेब म्हणतात, मी माझ्या कर्तव्यापासून तसुभरही ढळणार नाही, माझा प्राण गेला तरी माझ्या लोकांशी मी घात करणार नाही. मग त्यात माझा जीव गेला तरी चालेले. त्या पेक्षा तुम्ही गांधीना आपले उपोषन अठवडाभर तहकूब करायला सांगावे.
बाबासाहेबांच्या रोखठोक भूमिकेमुळे दुस-या दिवशी दुपारी परिषद स्थगीत होते.
सप्रूनी कार्यकर्त्यांबरोबर बसुन एक नवीन योजना तयार केली व रात्री परत सगळे चर्चेस जमले. तेंव्हा बाबासाहेब म्हणतात, अस्पृश्य वर्गास जातीय निवाड्यानुसार स्वतंत्र मतदर संघ मिळाले आहेत. त्या बदल्यात आम्हाला अधिक जागा मिळाव्यात व मध्यवर्ती विधिमंडळात लोकसंख्येंच्या प्रमाणात अस्पृश्याना जागा मिळाव्यात.
परिषदेतील नेत्याना हे मान्य झाले. जयकर, सप्रू, बिर्ला, राजेंद्रप्रसाद व राजगोपालाचारी हे रात्रीच्या रात्रीच्या गाडीने पुण्यास रवाना झाले.


************************

गांधीचे उपोषण सुरु
दिवस-१
२० सप्टे १९३२ रोजी ईकडे येरवडा तुरूंगात गांधीनी आमरण उपोषण सुरु केले. अस्पृश्यानी मिळालेल्या स्वतंत्र मतदार संघावर पाणी सोडावे अन दुहेरी मतदानाचा अधिकारही विसर्जीत करुन हताश जीवन जगावे. आम्ही देऊ त्यावर समाधाना मानावे असे गांधीनी जाहीर केले.  माझ्या या सर्व अटी मान्य करेस्तोवर अन्नाचे एक शीत न घेण्याचे जाहीर करुन गांधीनी बाबासाहेबांवर उपोषणरुपी अस्त्र डागले. बाबासाहेब या अस्त्राला परतवून लावतात की घायाळ होतात ते बघण्यासाठी ऊभा देश मुंबईकडे डोळे लावून होता. सर्व पत्रकार पुण्या मुंबईत ठाण मांडून बसलीत. गांधी येरवडा कारागृहातच आपले कार्यालय थाटुन बसले होते. त्यांच्या सोबत त्यांचे खंदे कार्यकर्ते होतेच. तिकडे मुंबईत बाबासाहेबाना गांधीच्या काही अत्यंत बलवान लढवय्या सरदारानी घेरले होते. बाबासाहेबांचं मानसिक खच्चिकरण करुन दलितांच्या अधिकारांची होळी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न चालू झाले. पण बाबासाहेबानीही मुत्सद्देपणाने खिंड लढवुन आपला निर्णय निर्भेडपने मांडला.
दिवस-२
२१ सप्टे १९३२ रोजी मुंबईहून आलेले पुढारी सकाळीच कारागृहात जाऊन गांधींची भेट घेतात.  बाबासाहेबांचे मत गांधीपुढे मांडतात. त्यावर गूढ व्यक्तिमत्व परत घोळ घालतो. शांत चित्ताने सगळं ऐकुन झाल्यावर गांधी म्हणतात की विचार करुन सांगतो. ही गांधीची टिपिकल स्टाईल होती. कार्यकर्त्याना शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रमात ठेवण्यात त्यांचा हतखंडा होता. सरदार पटेल व सरोजीनी नायडू गांधीच्या सेवेत होत्याच. गांधीची प्रकृती खालावत चालली होती. तुरूंगाबाहेर गांधीवाद्यांचा जमावडा वाढला होता. सप्रूनी दुपारी फोन करुन बाबासाहेबाना कळविले की लवकरात लवकर पुण्यास निघून यावे.  बाबासाहेब रात्रीची गाडी धरुन पुण्यास निघतात.
दिवस-३
२२ सप्टे १९३२ रोजी सकाळी बाबासाहेब पुण्यात पोहचतात. याच दिवशी गांधीजीनी डॉ. राजेंद्रप्रसाद व राजगोपालाचारी याच्या सोबत विचार विनिमय करुन पुढची स्ट्रॅटजी ठरविली. बाबासाहेबांच्या मागण्या काय आहेत हे तर मुंबईहुन आलेल्या प्रतिनिधीनी आधीच सांगितले होते. आता त्यावर गांधीनी या दोघांसोबत बसुन सखोल चर्चा केली व पुढचे पाऊल काय असेल ते ठरविले. अस्पृश्य वर्गाच्या सर्व जागाना निवडणुकीच्या प्राथमिक  व दुय्यम पद्धती लागु करण्यात याव्या. हे गांधीनी ठरविले.
बाबासाहेब पुण्यात पोहचले होते. नॅशनल होटेल मधे ते उतरले होते. गांधींचे म्हणने बाबासाहेबाना कळविण्यात आले. गांधीवादी पुढारी मात्र बाबासाहेबांवर दबाव आणण्याचे काम करु लागले. तणाव वाढत चालला होता. बाबासाहेबानी मुकाट्याने ब्रिटिश पंतप्रधाना तार करुन दिलेले दोन्ही अधिकार (स्वतंत्र मतदार संघ, दुहेरी मतदानाचा अधिकार) रद्द करण्या बाबत निवेदन दयावे अशी मागणी कार्यकर्त्यानी लावून धरली.  या सगळ्य़ा शेळ्या मेंढ्याना भीक न घालणार सिंह गरजून उठतो. असल्या बुड शेंडा नसलेल्या मागण्या करणा-या पुढा-यांपुढे डरकाडी फोडून सांगतो की, माझ्या समोर पर्यायी योजना आल्याशिवाय मी ब्रिटिश पंतप्रधानाना काहिच कळविणार नाही, मग काही झाले तरी झेलायची आपली तयारी आहे.  बाबासाहेबांचा दृढ निश्चय व भीम गर्जना इतकी प्रभावी अन  भेदक होती की सर्व पुढा-यानी झटक्यात माघार घेतला. आता सर्व पुढारी पर्यायी योजना दिल्याशिवाय बाबासाहेब ऐकणार नाही या मतावर आले. पर्यायी योजना देणे आता परिहार्य झाले होते. बाबासाहे या मुद्यावर लढण्यास सज्ज आहेत व सर्वोतोपरी युद्धाची सिद्धता करुन आले आहेत हे कळताच गांधीवादयानी मवाळ भूमिका घेतली.
दुपार पर्यंत वातावरण अत्यंत तापले होते. जयकर, सप्रू, पी. बाळू व एम. सी. राजा यानी दुपारी गांधीजींची भेट घेऊन समेट घडवून आणण्याची खात्री दिली.
याच दिवशी संध्याकाळी बाबासाहेब गांधीजीना भेटण्यास तुरुंगात गेले. त्यांच्या सोबत जयकर, बिर्ला, चुनीलाल मेथा व राजगोपालाचारी होते. गांधींची प्रकृती अत्यंत क्षीण झाली होती. ते मृत्युच्या देशेनी बरेच पुढे निघून गेले होते. त्यांची हि अवस्था पाहून बाबासाहेबांचे हृदय द्रवेल व ते आपला निर्णय लगेच जाही करतील असा गांधीवादयांचा अंदाज होता. बाहेर गांधीवादयांनी बाबासाहेबांच्या विरोधात गगनभेदी आरोळ्यानी आकाश दणाणून सोडले होते. या घोंघवत्या आवाजात बाबासाहेबांचा हट्ट विरघळून जाईल अशी सगळ्याना आशा होती. परंतू झाले उलटेच.... युगानूयुगे गुलामीत जगणा-यांच्या अधिकारावर घाला घालणारे गांधी दिसताच बाबासाहेब अधिक दृढ निश्चयी व कठोर बनतात. आपल्या बांधवांच्या हक्कासाठी सर्वतोपरी लढा देणारे बाबासाहेब मनोधैर्य एकवटून म्हणतात, गांधीजी तुम्ही माझ्यावर अन्याय करित आहात. तुम्हाला काही झाले तर काहीच कारण नसताना मला दोषी ठरविण्यात येईल. तुमचे प्राण आम्हाला महत्वाचे आहेत. पण आमचे अधिकारही तेवढेच महत्वाचे आहेत. तेंव्हा गांधी म्हणतात, डॉक्टर, तुम्ही सुचविलेली पॅनलची पद्धती मी मान्य करतो. पण तुम्ही तुमचे दोन्ही अधिकार सोडून दयावे अन हि पॅनलची पद्धती सर्व आरक्षित जागांवर लागू करावी. बाबासाहेबानी गांधीची ही सुचना मान्य केली.  मुलाखत संपली पण  आता  ईतर पुढा-यांसोबत पॅनलमधे किती उमेदवार असावेत, प्रत्येक प्रांतात अस्पृश्याना किती राखीव जागा दयाव्यात,  प्राथमिक निवडनुकीची पद्धत किती वर्षे चालवावी, राखीव जागांची सवलत किती वर्षे असावी अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यास सुरुवात झाली.

दिवस-४
२३ सप्टे १९३२ उजाडला.  आता बदली मागण्याची मिटींग भरली. बाबासाहेबानी बदली मागण्यात सर्व प्रांतात एकून १९७ जागा अस्पृश्याना मिळाव्यात असे जाहीर केले. कम्युनल अवार्ड (जातीय निवाडा) नुसार अस्पृश्याना केवळ ७८ जागा मिळाल्या होत्या. पण त्या स्वतंत्र मतदार संघ म्हणुन मिळाल्या होत्या. त्या बदल्यात बाबासाहेबानी राखीव जागा स्विकारण्याची तयारी दर्शविली पण त्या बदल्यात १९७ जागांची मागणी करताच गांधीवादी संतापाने गोरेमोरे होऊन उठले. नाराजीची लाट उसळली. बरीच खडाजंगी झाल्यावर त्यानी १२६ जागा देण्याचे मान्य केले. पण बाबासाहेब हट्टाला पेटले होते. जास्तीत जास्त मागण्या पदरात पाडून घेण्याचा त्यांचा निर्धार ठाम होता. पॅनल मधे किती उमेदवार असावे यावरही सभागृह पेटले. १० वर्षानी राखीव जागा रद्द कराव्यात असा गांधीवाद्यांनी आग्रह धरला पण राखीव जागांचा कालावधी न ठरविता १५ वर्षानी अस्पृश्यांचे सार्वमत घ्यावे अशी बाबासाहेबानी एक अत्यंत महत्वाची अट घातली. अशा प्रकारे चर्चा १० तासापेक्षा जास्त रंगली पण एकमत होताना दिसेना. शेवटी गांधीवादयानी गांधींजी भेट घेऊन संपुर्ण वृत्तांत कथन केला. ईतर सर्व मुदयांवर गांधी राजी झाले पण राखीव जागा रद्द करण्याचा कालावधी मात्र संकट बनुन उभा ठाकला होता. बाबासाहेबानी कालावधीला मान्यता न देण्याचा निर्णन अत्यंत कठोरपणे जाहीर करताना निक्षुन सांगितले की अस्पृश्यांचे सार्वमत घेऊनच राखीव जागा रद्द करण्यात याव्यात.  १० किंवा १५ वर्षाचा कालावधी झाल्यावर राखीव जागा रद्द करणे म्हणजे दलितांवर अन्याय होईल असे बजावुन सांगितले.
तो पर्यंत अशी बातमी आली की गांधीजींची प्रकृती आजुन बिघडली असुन आणिबाणीची वेळ उभी झाली होती. सायंकाळी बाबासाहेब स्वत: गांधीना भेटण्यासाठी तुरुंगात जातात. सार्वमताच्या प्रश्नाला गांधीजीनी पाठिंबा दिला पण त्यांनी वेगळाच फासा टाकला. गांधी म्हणाले ५ वर्षानीच सार्वमत घ्यावे. गांधीच्या या तर्कहिन व खोचक वाक्यानी बाबासाहेब अत्यंत दुखावतात. कधी कधी गांधी फारच तर्क विसंगत बोलत. अशा प्रकारे हि भेट ईथेच संपते. गांधीच्या हट्टापायी व बाबासाहेबांच्या दृढनिश्चयापायी आजच्या दिवसाची सारी चर्चा अनिर्णायक वळणावरच थांबली.

दिवस-५
२४ सप्टे १९३२ दिवस शनिवार, सकाळी परत चर्चा चालु झाली. शेवटी १४८ राखीव जागा देण्याचे ठरले व स्पृश्य हिंदुंच्या जागांपैकी १०% जागा अस्पृश्य वर्गाला देण्यात येतील असे ठरले. आता मात्र राखीव जागा रद्द करण्याचा कालावधी किंवा सार्वमत यावरुन खडाजंगी होऊ लागली. गांधीवादयानी १० वर्षासाठीच राखीव जागा असासाव्यात या मताला लावून धरले तर बाबासाहेबानी कुठल्या परिस्थीतीत कालावधी ठरवू नये. अस्पृश्यांचे सार्वमत घेऊनच राखीवजागा रद्द करण्याची अट घातली. या चर्चेतून काहीच परिणाम निघत नाही असे दिसु लागल्यावर शेवटी बाबासाहेबानी गांधींची भेट घेतली. गांधीशी झालेली चर्चातर अधिकच बिनबुडाची व तर्कविसंगत निघाली. गांधीनी ५ वर्षातच सार्वमत घेण्याचे बोलून दाखविले. बाबासाहेब मात्र आपल्या मतावर ठाम होते.शेवटी गांधी चिडून जातात अन निर्णायक आवाजात गरजतात,  ५ वर्षात सार्वमत घ्या किंवा माझा जीव घ्या.
गांधींचा अविचारीपणा बाबासाहेबाना अजिबात आवडला नव्हता. ते तडक उठून बोलणीच्या ठिकाणी आलेत व शेवटी त्यानी रोकठोक भूमिका मांडली, सार्वमत कमीत कमी १० वर्षानी घ्यावे किंवा बोलणी थांबवू या असे जाहीर केले. बाबासाहेबांचा निर्णायक सुर ऐकून गांधीवादी नेत्यांचे धाबेदणाणले. दाबावाचे सर्व तंत्र निष्क्रीय करण्यात बाबासाहेबांनी आघाडी घेतली. आता मात्र त्यांचे सर्व अस्त्र निकामी झाले होते. शेवटी सार्वमताचा मुद्दा बाजूला सारुन मुदतीचा नामनिर्देश न करता करार करावा असे ठरले. दुपारी ३ वाजता राजगोपालाचारी यानी ही माहिती तुरुंगात जाऊन गांधीना सांगितली. गांधीनी आशिर्वाद दिला. चर्चेच्या ठिकाणी आनंदाच्या कारंज्या उडाल्या. लगोलगो कराराचा मसूदा तयार करण्यात आला. करार खालील प्रमाणे होता.

पुणे करार (संक्षिप्त मसूदा)

१)     प्रांतीय  विधानसभामध्ये साधारण निवडणूक क्षेत्रांमधील जागांपैकी दलित वर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात येतील. त्या येणेप्रमाणे मद्रास-३०, मुंबई व सिंध मिळून-१५, पंजाब-७, बिहार व ओरिसा-१८, मध्यभारत-२०, आसाम-७, बंगाल-३०, मधप्रदेश-२० अशा प्रकारे एकूण जागा १४८ अस्पृश्यांसाठी देण्यात आल्या.
२)     या जागांची निवडणूक संयुक्त निवडणूक संघ पद्धतीद्वारे  प्रकारे केली जाईल. प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील ४ अमेदवारांचे पॅनल निवडले जाईल. या चार उमेदवरांतुन ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो विजयी उमेदवार जाहीर होईल.
३)     केंद्रिय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरिल कलम दोनच्या नुसार होईल.
४)     केंद्रिय कारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल आणि त्यांची निवड वरील प्रकारे होईल
५)     उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडींची व्यवस्था केंद्रिय तसेच प्राम्तीय कार्यकारिणींसाठी ज्यांचा वर उल्लेख केला आहे. पहिल्या १० वर्षा नंतर समाप्त होईल.
६)     प्रांतीय व केंद्रिय कार्यकारिनीमध्ये  दलितांच्या जागांचे प्रतिनिधीत्व जसे वरील कलम १ व ४ मध्ये दिले आहे.  तो पर्यंत अमलात असेल जो पर्यंत  दोन्ही संबंधीत पक्षांद्वारा आपसात समझौता होऊन त्यास हटविण्याची सर्वसंमत निर्णय होत नाही.
७)     केंद्रिय व प्रांतिक कार्यकारिणींच्या निवडणूकीत दलितांचा मतदानाचा अधिकार लोथियन समीतीच्या अहवालानुसार असेल.
८)     दलिताना स्थानीक निवडनूका व सरकारी नोकरीसाठी जातीय करणामुळे डावलल्या जाऊ नये. पात्रता असलेल्या प्रत्येक दलितास नोकरीत घ्यावे.
९)     सर्व प्रांतात शैक्षणीक अनुदान देऊन दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात यावे.
असा होता पुणे करार.

मसुदा तयार झाला, आता सह्या करण्याची वेळ आली तेवढ्यात मद्रासच्या अस्पृश्यानी एम.सी. राजा यानी करारावर सही केल्यास आम्ही बाबासाहेबाना सही करु देणार नाही अशी विरोधाची भूमिका घेतली. कारण या एम. सी. राजानी मुंजे सोबत जो करार केला होता तो अस्पृश्यांचा घात करणारा होता. त्यामुळे अशा अस्पृश्य द्रोहीनी या करारावर सही करु नये अशी मद्रासच्या दलितांची मागणी होती. शेवटी यातही तडजोड करण्यात आली व सह्यां करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबानी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवियाने सही केली.
इतर सर्व सभासदानीही सह्या केल्या.  अन तिकडे तुरूंगातही एकच जल्लोष उडाला. गांधीनी उपोषण सोडले. त्यानी बाबासाहेबांचे अभिनंदन केले.
२५ सप्टे १९३२ रोजी सर्व पुढारी करार मंजूर करण्यासाठी मुंबईत आले. ब्रिटिश महाराज्यपालाना या कराराची माहिती तारेने कळविण्यात आली. मुंबई राज्यपालांच्या कार्यवाहांना दोन्ही पक्षाच्या पुढा-याने प्रत्यक्षपणे माहिती दिली. २६ सप्टे १९३२ रोजी ब्रिटिश मंत्रीमंडळाने पुणे करार मंजूर करुन घेतला. त्यावर मंत्रीमंडळाने शिक्का मोर्तब केले.  तिकडे दिल्लीत हिंदु महासभेनेही आपली मंजूरी दिली. अशा प्रकारे पुणे करार घडवून गांधीनी दलितांचे अत्यंत महत्वाचे दोन अधिकार काढुन घेतले.  मात्र हेच अधिकार शिख, मुस्लिम व ख्रिश्चनाना खुशाल बहाल केले.

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह