लोकशाहीचे अस्तित्व आपणाला टिकवावयाचे असेल तर

लोकशाही केवळ बाह्य स्वरूपातच नव्हे, तर प्रत्यक्ष व्यवहारात ठेवण्याची इच्छा असेल तर, आपण काय केले पाहिजे ! लोकशाहीचे अस्तित्व आपणाला टिकवावयाचे असेल तर माझ्या मते आपण जी पहिली गोष्ट केली पाहिजे ती ही की, "आपली सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गाचाच अवलंब केला पाहिजे" याचा अर्थ असा की "क्रांतीचे घातपाती मार्ग वर्ज्य केले पाहिजेत". याचा दुसरा अर्थ असा की, सविनय कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्गही आपण वर्ज्य मानले पाहिजेत. सामाजिक व आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करून घेण्यासाठी जेव्हा सनदशीर मार्गाचा अवलंब करणे आपल्याला शक्य नव्हते तेव्हा आपण या "असनदशीर मार्गाचा अवलंब करणे योग्य होते. परंतु "सनदशीर" मार्गांनी आपली उद्दिष्टे साध्य करणे शक्य आहे तेव्हा असनदशीर मार्गाचा कोणी अवलंब केला तर ते कृत्य समर्थनीय ठरणार नाही. हे असनदशीर मार्ग म्हणजे अराजकाची उगमस्थाने होत. हे मार्ग आपण जेवढ्या लवकर वर्ज्य करू तेवढे आपणाला अधिक हितावह ठरेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२५ नोव्हेंबर १९४९ नवी दिल्ली
घटना समितीतील समारोपाचे भाषण

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह