जगात एकमेव असे महापुरुष होऊन गेले कि ज्यांनी आपल्या ग्रंथालयासाठी घर बांधले
ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय .
ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय .
राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या तिसऱ्या अधिवेशनातील ऐतिहासिक कामगिरी बजावून बाबासाहेब भारतात आले त्यांचे प्रचंड स्वागत करण्यात आले . मुंबईत आल्यावर ते परळ येथील पोयबावाडीतील सिमेंटच्या चाळीत रहात होते. तब्बल २५ वर्षे ते ह्या सिमेंटच्या चाळीतच रहात होते. दहा फुट लांब व दहा फुट रुंद अशा दोन खोल्यांमध्ये एवढ्या मोठ्या परदेशी पदव्या मिळवून, अथांग ज्ञान मिळविणाऱ्या व कोट्यावधी जनतेच्या अंतःकरणातील कंठमणी बनलेल्या बाबासाहेबांना अजूनही सिमेंटच्याचाळीतून वर डोके काढता येत नव्हते ह्या चाळीतच अंगमेहनतीचे काम करून घाम गाळणारे मजूर, काबाडकष्ट करणारे मजूर रहात तेथेच ज्ञानाचे कष्ट उपसणारे बाबासाहेब सुद्धा रहात होते.
भारतातील एकही पुढारी भारतातीलच का ? जगातील एकही पुढारी अशा निकृष्ट ठिकाणी रहात नव्हता . समाजाचे व संघटनेचे पुढारी राजेशाही थाटात रहात होते. प.नेहरू राजवाड्यासम आनंद भवनात राहत होते यावरून त्याकाळच्या विषमतावादी समाजरचनेचा अर्थ आपल्याला समजतो .
परिस्थितीला अंगबळापेक्षा बुद्धिबळानेच तोंड दिले पाहिजे . आणि त्यासाठी ग्रंथालय आपल्या संग्रही पाहिजे .मुंबईच्या परेल वाॅर्डातील दामोदर हॉलमध्ये बाबासाहेबांचे ऑफिस होते. तेव्हा जी ग्रंथ सामुग्री होती ती फारच अपुरी होती. त्यामुळे ते सैदव ग्रंथ संग्रहाच्या छंदामध्ये गर्क असत. आणि त्यासाठीच त्यांनी " राजगृह " उभे केले . बँकेचे कर्ज काढून त्यांना हवे असे निवासस्थान बांधण्याचे त्यांनी ठरविले .
हे निवासस्थान वैशिष्यटपूर्ण असावे इतर लोकांच्या इमारतीसारखा या निवासस्थानाचा घाट असू नये
दरवाजे,खिडक्या,गच्ची सुसुज्ज ग्रंथालय कसे असावे ,खुर्च्या टेबलांची व्यवस्था असावी , स्तंभ कसे असावेत इमारतीची उंची घुमट गोलाकार असावा .व त्याचे नाव काय असावे याबद्दल बाबासाहेबांचा मोठा कटाक्ष होता. ते स्वःत गृहनिर्माण शास्त्रज्ञ तर नव्हते .परंतु निरनिराळ्या इंजिनिअरांशी सल्लामसलत करून त्यांनी आराखडा तयार केला होता . तळाचे बांधकाम बरोबर नसल्याचे त्यांना समजले आणि त्यांनी ते पुनः पुनाः तोडून मग करवून घेतले .
हे निवासस्थान वैशिष्यटपूर्ण असावे इतर लोकांच्या इमारतीसारखा या निवासस्थानाचा घाट असू नये
दरवाजे,खिडक्या,गच्ची सुसुज्ज ग्रंथालय कसे असावे ,खुर्च्या टेबलांची व्यवस्था असावी , स्तंभ कसे असावेत इमारतीची उंची घुमट गोलाकार असावा .व त्याचे नाव काय असावे याबद्दल बाबासाहेबांचा मोठा कटाक्ष होता. ते स्वःत गृहनिर्माण शास्त्रज्ञ तर नव्हते .परंतु निरनिराळ्या इंजिनिअरांशी सल्लामसलत करून त्यांनी आराखडा तयार केला होता . तळाचे बांधकाम बरोबर नसल्याचे त्यांना समजले आणि त्यांनी ते पुनः पुनाः तोडून मग करवून घेतले .
" राजगृह " जानेवारी १९३४ मध्ये तयार झाल्यावर त्याचे नाव 'राजगृह ' असे ठेवण्यात आले.त्यावेळी कोणाला माहितही नसेल कि 'राजगृह ' हे भगवान बुद्धांच्या जीवन यात्रेतील एक महत्वाचे धम्म स्थळ होते. या स्थळातून व या नव्या नावातून बाबासाहेबांना धम्म इतिहासाची स्फूर्ती मिळत होती. बाबासाहेब आंबेडकर सहकुटुंब " राजगृहात " राहावयास आले.यावेळी आदरणीय रमाबाईंना झालेला आनंद अपूर्व होता. घरातील सर्वच मंडळी आनंदी होते. बाबासाहेबांच्या जीवनात
" राजगृहाचे" स्थान अगदी अनन्यसाधारण आहे. रमाबाईंना व बाबासाहेबांना हे जीवन प्रथमच लाभले होते.
" राजगृहाचे" स्थान अगदी अनन्यसाधारण आहे. रमाबाईंना व बाबासाहेबांना हे जीवन प्रथमच लाभले होते.
" राजगृहाच्या " तळाला सभोवर छोट्याश्या बगीचाची सोय होती,पहिल्या माळ्यावर हवेशीर आगाशी होती पहिल्या माळ्यावर प्रवेश केलानंतर समोरच एक प्रशस्त हॉल होता मध्यभागी अत्यंत आकर्षक सोफा होता. जेव्हा बाबासाहेब थकून जात त्यावेळी ते ह्या सोफ्यावर आराम करीत असत. खाली तळास तीन -तीन खोल्या होत्या त्यात आकर्षक अशा फरशा बसविण्यात आल्या होत्या. गच्चीवर रंगबिरंगी पद्धतीच्या कलात्मक चीनिमातीचे तुकडे बसवून आकर्षकता निर्माण केली होती. तेथे भरपूर सूर्यप्रकाश येत असे.
बाबासाहेबांनी आपल्या लायब्ररीचे वेगवेगळे खास विभाग केले होते .प्रत्येक ग्रंथाचे वेगवेगळे शेल्फ तयार करून त्या शेल्फवर ठळक वळणदार अक्षरांची पट्टी लावलेली होती . बाबासाहेबांना प्रत्येक ग्रंथ किंवा प्रत्येक ग्रंथावरील मजकूर कोणत्या पानावर लिहिलेला आहे हे किंवा कोणता ग्रंथ कोणत्या रंगाचा आहे व किती जाड आहे हे ते तोंडी सांगत असत यावरून बाबासाहेबांची अचाट स्मरणशक्ती केवढी मोठी होती हे समजते .
कोणीही विद्वान, गर्भश्रीमंत , पंतप्रधान ,अध्यक्ष वा बादशहा देखील थक्क होऊन जाईल एवढा मोठा आकडा बाबासाहेबांच्या ग्रंथसंग्रहाचा होता ( २२००० ) बावीस हजाराहून अधिक ग्रंथ बाबासाहेबांनी संग्रही ठेवले होते. लायब्ररीच्या शेल्फवर छोटे छोटे बोर्ड त्यांनी लावलेले होते. त्यावर सुविचार लिहिलेले होते ." जर तुम्हांला माणूस बनवायचे असेल तर "
" स्वतःच स्वतःशी कठोर शिस्तीने वागले पाहिजे "
" सत्य हे सत्य म्हणूनच ओळखा , असत्य हे असत्य म्हणूनच ओळखा "
" धर्म मनुष्याकरिता आहे , मनुष्य धर्माकरिता नाही ."
कोणीही विद्वान, गर्भश्रीमंत , पंतप्रधान ,अध्यक्ष वा बादशहा देखील थक्क होऊन जाईल एवढा मोठा आकडा बाबासाहेबांच्या ग्रंथसंग्रहाचा होता ( २२००० ) बावीस हजाराहून अधिक ग्रंथ बाबासाहेबांनी संग्रही ठेवले होते. लायब्ररीच्या शेल्फवर छोटे छोटे बोर्ड त्यांनी लावलेले होते. त्यावर सुविचार लिहिलेले होते ." जर तुम्हांला माणूस बनवायचे असेल तर "
" स्वतःच स्वतःशी कठोर शिस्तीने वागले पाहिजे "
" सत्य हे सत्य म्हणूनच ओळखा , असत्य हे असत्य म्हणूनच ओळखा "
" धर्म मनुष्याकरिता आहे , मनुष्य धर्माकरिता नाही ."
बाबासाहेबांनी आपल्या लायब्ररीला एखाद्या पाॅवर हाऊसचे स्वरूप आणले होते. जगातील सर्व प्रकारचे ज्ञान त्यांनी आपल्या " राजगृहात " संग्रहित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता.
एकदा पंडित मदनमोहन मालवीय हे बाबासाहेबांना भेटण्यास गेले असता त्यांनी हि लायब्ररी पाहिली आणि कित्येक लाख रुपयास विकत मागितली परंतु बाबासाहेबांनी त्या सौद्यास साफ नकार दिला हा नकार देतांना बाबासाहेब मालवीयांना म्हणाले , तुम्ही तर माझी शक्तीच विकत मागता ; ती मी कशी देईन ? यावरून बाबासाहेबांचे व राजगृहातील लायब्ररीचे नाते आपल्यला समजून येते .
ज्ञानार्जनाबरोबर बाबासाहेबांच्या आवडीची दुसरी गोष्ट म्हणजे 'कपडे ' त्यांना नीटनेटका पोशाख आवडत असे . सर्वांना ते सांगत कि पोशाख नीटनेटका ठेवावा. त्याचे महत्व पटवून देतांना ते म्हणत ; 'एक नूर आदमी आणि दास नूर कपडा ' गबाळा पोशाख त्यांना अजिबात आवडत नसे ते म्हणत जो स्वतःच्या पोशाखाची काळजी घेऊ शकत नाही त्यांच्या हातून काय कार्य होऊ शकेल .
स्वतःबद्दल ते अभिमानाने म्हणत ; भारतात जे उत्कृष्ट पोशाख घालणारे मोजके बॅरीस्टर आहेत , त्यापैकी मी एक आहे .
स्वतःबद्दल ते अभिमानाने म्हणत ; भारतात जे उत्कृष्ट पोशाख घालणारे मोजके बॅरीस्टर आहेत , त्यापैकी मी एक आहे .
असे बाबासाहेब ! असे राजगृह !
राजगृह हे एक महान सांस्कृतिक केंद्र होते खऱ्याखुऱ्या मानवतेचे हे केंद्र होते.
येथूनच चळवळीचे प्रकाशझोत फेकल्या गेले, येथूनच विरोधकांची दाणादाण उडविली जात होती ,
येथूनच कनिष्ठ वर्गाला दीड हजार वर्षात कधी न मिळालेला दिलासा मिळत होता,
येथूनच स्वाभिमानी चळवळीचे दीप प्रज्वलित केले जात होते ,
येथेच बाबासाहेबांना ठार करण्याची धमकी देणारी रक्ताने लिहिलेली पत्रे येत होती . येथूनच
बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहिले .' मुक्ती कोण पथे ' शुद्र पूर्वी कोण होते ? " असे अनेक ग्रंथ
राजगृह हे एक महान सांस्कृतिक केंद्र होते खऱ्याखुऱ्या मानवतेचे हे केंद्र होते.
येथूनच चळवळीचे प्रकाशझोत फेकल्या गेले, येथूनच विरोधकांची दाणादाण उडविली जात होती ,
येथूनच कनिष्ठ वर्गाला दीड हजार वर्षात कधी न मिळालेला दिलासा मिळत होता,
येथूनच स्वाभिमानी चळवळीचे दीप प्रज्वलित केले जात होते ,
येथेच बाबासाहेबांना ठार करण्याची धमकी देणारी रक्ताने लिहिलेली पत्रे येत होती . येथूनच
बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहिले .' मुक्ती कोण पथे ' शुद्र पूर्वी कोण होते ? " असे अनेक ग्रंथ
! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!
--------सविता राजेंद्र बाविस्कर ----------
Comments
Post a Comment