महामानव डॉ बाबासाहेब अंबेडकर

महामानव डॉ बाबासाहेब अंबेडकर 
स्वतः अत्यंत प्रतिकूल परिस्थिति मधे शिकून आपले सम्पूर्ण जीवन देशबांधवांसाठी वाहून देणारा हां महान युगपुरुष भारत देशात जन्माला आला हे आपले भाग्य आहे ! त्यांचे मानवतावादी, परिवर्तनवादी विचार आजही सम्पूर्ण जगात गौरवले जात आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचे ते खरे वारसदार ठरले. भारत देशातील गोर गरीब, उपेक्षित लोक तथाकथित उच्च मानल्या जाणार्या लोकांच्या पायाखाली चिरडले जात असतानाच मनुवादी प्रवृत्तीला ठेचान्यासाठी भारत देशात भिमराव आंबेडकर या सुर्याचा जन्म झाला. यांचे तेज पाहून सनातनी वैदिक लोकांच्या विषमतावादी, अन्यायी प्रवृत्तीला सुरुंग लागला आणि खर्या अर्थाने भारत देश स्वतंत्र झाला !
होय महामानव आंबेडकर यांचे कार्य पाहून तत्कालीन ब्रिटिश शासन ही अचंबित झाले ! आणि त्यांनी डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांची दखल घेत त्यांना त्यांच्या हक्काचे स्थान दिले ! आंबेडकर यांनी स्वतःच्या हिमतिवर शिक्षण घेतले , अतिशय बिकट परिस्थितीवर मात करत त्यांनी अनेक डिग्री मिळवल्या.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रातील योगदान आणि अभ्यास...
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून महामानवाने अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र इत्यादी विषयाचे अध्ययन केले, त्यात प्राविण्य मिळवले. १९१५ मध्ये "प्राचीन भारताचा व्यापार" या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एम. ए. हि पदवी संपादन केली. तसेच १९१६ मध्ये त्यांनी "National Divident of India: A historical and analytical study" या प्रबंधाबद्दल त्यांना कोलंबिया विद्यापीठाने Ph. D. हि पदवी प्रदान केली या प्रबंधाची मांडणी, संशोधन आणि चिकित्सक दृष्टीची अर्थशास्त्रातील विद्वानांनी मुक्तकंठाने स्तुती केली. संपूर्ण अमेरिकेत त्यांचे नाव गाजले. म्हणजेच "प्राचीन भारताचा व्यापार" आणि "National Divident of India: A historical and analytical study" हे दोन्हीही प्रबंध महामानवाने केवळ भारत देश समोर ठेऊन आणि त्याचे अर्थशास्त्रीय संशोधन करून त्यांची मांडणी केली होती हे आपल्याला लक्षात येते. म्हणजे प्राचीन आणि तत्कालीन भारताचा अर्थशास्त्राचा गाढा अभ्यास डॉ आंबेडकर यांनी केलेला होता. पुढे डॉ आंबेडकर यांनी अर्थशास्त्र मध्ये आणखी संशोधन करण्याची व लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्रीय पदाची संपादन करण्याची महत्वकांक्षा महामानवाने ठेवली. १९२१ मध्ये "Problem of Rupee" हा प्रबंध त्यांनी "London School of Economics " मध्ये मांडला. त्यांना D.Sc. हि पदवी संपादन करण्यात आली. आज जेव्हा आपण याच विद्यापीठात पाउल ठेवतो तेव्हा तेथील त्यांच्या प्रतिमे खाली "Symbol of Knowledge" असे लिहून ठेवलेले आहे. म्हणजेच या विध्यापिठला डॉ आंबेडकर यांच्या सारखे विद्यार्थी लाभले याचा गर्व आहे.
भारत देशातील सामाजिक सुधारना...
भारत देश सनातनी वैदिक लोकांच्या गुलामगिरीत असताना त्यांच्या या वर्चस्ववादाला आव्हान देत, अहिंसक प्रयत्नांनी डॉ आंबेडकर यांनी शोषित , उपेक्षित भारतीय लोकांना न्याय , हक्क मिलवुन देण्यासाठी प्रयत्न सुरु केले ! तेहि कायदेशीर मार्गाने ! त्यात त्यांना प्रचंड यश मिळत गेले आणि भारत देश खर्या अर्थाने स्वतंत्र होउ लागला ! खरे तर महामानव आंबेडकर यांच्यापेक्षा कमी शिक्षण घेतलेले तथाकथित विद्वान ब्रिटिश शासनाच्या पायात लोळन घेत त्यांची नोकरी करत होते ! परन्तु डॉ आंबेडकर यांनी तसे न करता भारतीयांसाठी स्वतःला वाहून घेतले ! म्हणजे खर्या अर्थाने त्यागाची मूर्ति महामानव आंबेडकर आहेत ! त्यांच्या या महान कार्यास कोटि कोटि प्रणाम !
जय भीम !

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह