बाबासाहेब खरे अहिंसक नव्हते काय..??

बाबासाहेब खरे अहिंसक नव्हते काय..??





१९३२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'पुणे करारावर' सही करून हट्टी गांधींना जीवनदान दिले मात्र या जीवनदानाच्या तडजोडीत अस्पृश्य व पददलित समाजाला स्वतंत्र मतदारसंघ मिळावे यासाठी चाललेल्या धडपडीत त्यांना यश मिळवता आले नाही. फार कमी जागांवर त्यांना समाधान मानावे लागले. प्रसंगी स्वतःचे नुकसान पत्करून ज्या हिंदू समाजाने त्यांच्यावर इतके अन्याय केले त्याच समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बॅं. गांधीचा प्राण वाचवणे अधिक महत्वाचे मानणारे बाबासाहेब खरे अहिंसक नव्हते काय..?? महाकारुणिक नव्हते काय..??

 

पुणे कराराच्या बातम्यांत देखील बाबासाहेबांचे नाव चुकुनही येऊ नये याची दक्षता कटाक्षाने घेणारी "अखिल भारतीय' स्वरुपाची सनातनी दैनिक वृत्तपत्रे त्या काळातही होतीच. ज्याचा परिणाम अगदी आताच्या हॉलीवूडपट 'गांधी'मधून सुद्धा पाहायला मिळतो. गांधीच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या घटनेचा साधा उल्लेखही गांधी चरित्रात किंवा त्यांच्या चित्रपटात येउन नये व पर्यायाने बाबासाहेब मोठे ठरू नयेत याची काळजी सनातनी टाळकी आजही घेत असताना दिसतात.



१९३२ ते १९३४ पर्यंत पुणे करारासंबंधीचे वादळ शमते न शमते तोच डॉक्टर साहेबांनी धर्मांतराचा अणुबॉम्ब टाकला आणि त्यासरशी सर्व सनातनी वर्तमान पत्रे आणि संस्था खडबडून जाग्या झाल्या. बाबासाहेबांची सर्व स्तरांतून चौकशी होऊ लागली. अनंत हरी गद्रे 'झुणका भाकर सत्यनारायण' करू लागले. त्यात प्र.के. अत्रे आदी सुधारक मंडळी भाग घेऊ लागली. मामा वारेकर आदी मंडळी उपनयन संस्कार करून अस्पृश्यांना जानवी घालू लागली. सावरकर अस्पृश्यांसाठी सार्वजनिक मंदिरे उभारण्याच्या तयारीत लागले तर दुसर्या बाजूस गांधीवाद्यांनी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाची योजना आखली.

 

बाबासाहेब मात्र होत असलेल्या या सगळ्या धावपळीकडे निरासक्त वृत्तीने पाहत आपल्या पुढील कार्याची योजना आखत होते. आजवर त्यांच्या कार्याची दाखल घ्यायची नाही असे ठरवलेल्या लोकांना सुद्धा त्यांनी अक्षरशः बचैन करून सोडले होते. याच काळत ते अस्पृश्यांची सभा-संमेलने भरवून त्यांच्यात स्वाभिमान व जागृती चेतवत होते. धर्मांतर हेच सर्वस्व नसून त्यासोबत कायदेमंडळतल्या मनाच्या जागा पटकवायला अस्पृश्य तरुणांना सांगत होते. पोटतिडकीने भौतिक सुखाचा व मानसिक स्वातंत्र्याचा मूलमंत्र या बाराद्लेल्या समाजाला देत होते.



लेखं- गौरव गायकवाड(प्रबोधन टीम)

http://prabodhnteem.blogspot.in/2013/06/blog-post_27.html

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह