बावीस प्रतिज्ञा खालील प्रमाणे आहेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा गुलामगिरीत न जाण्यासाठी तसेच अंधश्रद्धा न बाळगता विज्ञानदृष्टी ठेवून उत्तम जीवन जगण्यासाठी सर्व अनुयायांना बौद्धधम्माच्या बावीस प्रतिज्ञा पाळायला सांगितल्या. त्या बावीस प्रतिज्ञा खालील प्रमाणे आहेत:
१. मी ब्रह्मा , विष्णु , महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२. राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
३. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
४. देवाने अवतार घेतले, यावरमाझा विश्वास नाही.
५. गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
६. मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
७. मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
८. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
९. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
१०. मी समता स्थापन करण्याचाप्रयत्न करीन.
११. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
१२. तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
१३. मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
१४. मी चोरी करणार नाही.
१५. मी व्याभिचार करणार नाही.
१६. मी खोटे बोलणार नाही.
१७. मी दारू पिणार नाही.
१८. ज्ञान (प्रज्ञा) , शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
१९. माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो वबौद्धधम्माचा स्वीकार करतो.
२०. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
२२. इतःपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह