रमाबाई सारखी सहचारिणी
डॉ.बाबसाहेब आंबेडकरांना आपल्या पत्नी रमाबाईंच्या कष्टमय जीवनाची जाणीव होती रमाबाई सारखी सहचारिणी लाभली म्हणूनच आपण परदेशात जाऊन वर्षानुवर्षे उच्च शिक्षण घेऊ शकलो व अस्पृशोद्धाराच्या सामाजिक कार्यात समरस होऊ शकलो , ही गोष्ट किंवा वस्तुस्थिती ते कधीही अमान्य करीत नसत. पतीनिष्ठ रमाबाईचे उदाहरण दृष्टीसमोर ठेवून बाबासाहेब जाहीरपणे सांगत असत कि, स्त्री हा समाजाचा अलंकार आहे . आपल्या कुटुंबाचा नावलौकिक स्त्रियांच्या शिलावरच अबलंबून असतो. स्त्री हि जशी गृहिणी तशीच सुसंस्कारित समाज निर्माण करणारी माता आहे.
ज्योतीराव फुले यांनी ज्याप्रमाणे आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईंना स्वतः घरी शिक्षण देऊन सामाजिक शैक्षणिक कार्य करण्यास प्रवृत्त केले, त्याचप्रमणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही आपल्या पत्नीला म्हणजेच रमाबाईला घरीच लिहायला वाचायला शिकविले आणि अस्पृश्यांच्या महिला संघटनेमध्ये प्रत्यक्ष भाग घ्यायला प्रवृत्त केले. रमाबाईंना पत्र देखील लिहिता येत असे. आता त्यांनी मुद्देसूद व प्रभावी भाषण कसे करावे, याचे पाठ रमाबाईंना द्यावयास सुरुवात केली. प्रथमतः महिलांच्या घरगुती बैठकीमध्ये आणि नंतर महिलांच्या सभेत सुबोध, पण मुद्देसूत भाषण त्या देऊ लागल्या . लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यास लोखंडाचे सोने झाल्याशिवाय कसे राहील ?
रमाबाई ह्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. महिला संघटनाचे कार्य त्यांनी आपले जीवनकार्य बनविले.
एकदा मुंबई जे.जे.हॉस्पीटलच्या आवारात झालेल्या प्रचंड सभेत रमाबाई आंबेडकरांचे भाषण अतिशय प्रभावी झाले. त्यांच्या भाषणावर असंख्य उपस्थित श्रोत्यांकडून टाळ्या मिळाल्या. स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला .त्यांचा त्या भाषणाचा अहवाल दुसऱ्या दिवशी स्थानीय वृत्तपत्रातून छापला गेला होता. अशा प्रकारे अस्पृश्य महिलांचे नेतृत्व मिळालेल्या रमाबाईंच्या सक्रीय सहकार्याने बाबासाहेबांची चळवळ महिलांच्या क्षेत्रातही उजळून निघाली. महिला जागृतीला रमाबाईंमुळेच विशेष स्फूर्ती मिळाली , असे म्हटल्यास अतिशोयक्ती होणार नाही.
रमाबाई ह्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. महिला संघटनाचे कार्य त्यांनी आपले जीवनकार्य बनविले.
एकदा मुंबई जे.जे.हॉस्पीटलच्या आवारात झालेल्या प्रचंड सभेत रमाबाई आंबेडकरांचे भाषण अतिशय प्रभावी झाले. त्यांच्या भाषणावर असंख्य उपस्थित श्रोत्यांकडून टाळ्या मिळाल्या. स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला .त्यांचा त्या भाषणाचा अहवाल दुसऱ्या दिवशी स्थानीय वृत्तपत्रातून छापला गेला होता. अशा प्रकारे अस्पृश्य महिलांचे नेतृत्व मिळालेल्या रमाबाईंच्या सक्रीय सहकार्याने बाबासाहेबांची चळवळ महिलांच्या क्षेत्रातही उजळून निघाली. महिला जागृतीला रमाबाईंमुळेच विशेष स्फूर्ती मिळाली , असे म्हटल्यास अतिशोयक्ती होणार नाही.
अशा ह्या महान मातेस माझे कोटी कोटी प्रणाम ...............
! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!
------------सविता राजेंद्र बाविस्कर --------
Comments
Post a Comment