अशा महान मातेस माझे कोटी कोटी प्रणाम .....
१९२३ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला वकिलीचा व्यवसाय सुरु केला . रमाई ला असे वाटू लागले कि आपले पती संसाराला लागले, हे पाहून साध्वी रमाबाईंना आनंद होणे स्वाभाविकच होते. ,
एकदा वकिलीची फी म्हणून डॉ. बाबासाहेबांना तीनशे रुपये मिळाले. तेव्हा ते सर्व रुपये त्यांनी रुमालात बांधून घरी जावून आपल्या पत्नीच्या स्वाधीन केले . इतके रुपये एकदम पाहून रमाबाईंचा आनंद गगनात मावेना कारण इतके रुपये त्या मातेने जीवनात कधीच पहिले नव्हते .
प्रत्येक स्त्रीला वाटते कि आपल्या पतीने संसाराकडे लक्ष द्यावे , यावरून त्या नेहमी बाबासाहेबांना बोलत असत , एकदा त्या खूप चिडल्या त्यावर बाबासाहेब म्हणाले
माझ्या नावाने सारखी ओरडत असतेस मग मी काय करावे असे तुला वाटते ?"
त्यावर रमाबाई उद्गारल्या , " अहो , घरात भाजीपाला , तेल मीठ , गहू, तांदूळ वगैरे वस्तू लागतात याकडे तरी नवऱ्याने थोडे लक्ष द्यावे . कधी मुलाबाळांना जवळ घ्यावे , त्यांना ओंजारावे -गोंजारावे , बायकोशी दोन शब्द प्रेमाने बोलावेत. परंतु तुमचे मात्र सर्वच मुलखावेगळे ! येऊन जाऊन तुमची ती जाडजूड पुस्तके , त्यांचे सतत वाचन आणि तुम्ही ! "
रमाबाईंच्या डोळ्यात अश्रू होते त्यांनी अनेक दिवसांची मनोव्यथा आपल्या पतीसमोर व्यक्त केली .तेव्हा खऱ्या परिस्थितीची जाणीव बाबासाहेबांना देखील झाली आणि त्या महामानवाचे डोळे पाणावले आणि ते आपल्या पत्नीला म्हणाले, " रामू ! तू अशी साध्वी आहेस ना म्हणूनच मी असा राहू शकतो !"
रमाबाईंनी आपल्या संसाराविषयक भ्रामक स्वप्नांचे मोहपाश झुगारून दिले तात्काळ त्या स्वाभिमानाने उद्गारल्या , ' साहेब ! आपणास आपल्या कोट्यावधी अस्पृश्य बांधवांचा , समाजाचा कल्याणाचा संसार करावयाचा आहे.
पत्नीचे हे उद्गार ऐकून बाबासाहेबांच्या उत्साहात पुन्हा जागृती आली .कर्तुत्वाला चालना मिळाली . ध्येयस्थानाची नवीन स्फूर्ती मिळाली . म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर माता रमाबाईंना
आपले स्फूर्तीस्थान मानत .रमाबाईंनी पतीच्या कष्टमय ध्येयवादी जिवनात प्रामाणिकपणे साथ दिली . त्यांच्या अंगीकृत कार्यात त्यांच्या मागे सावलीसारख्या खंबीरपणे सतत उभ्या राहिल्या .
अशा महान मातेस माझे कोटी कोटी प्रणाम .................
एकदा वकिलीची फी म्हणून डॉ. बाबासाहेबांना तीनशे रुपये मिळाले. तेव्हा ते सर्व रुपये त्यांनी रुमालात बांधून घरी जावून आपल्या पत्नीच्या स्वाधीन केले . इतके रुपये एकदम पाहून रमाबाईंचा आनंद गगनात मावेना कारण इतके रुपये त्या मातेने जीवनात कधीच पहिले नव्हते .
प्रत्येक स्त्रीला वाटते कि आपल्या पतीने संसाराकडे लक्ष द्यावे , यावरून त्या नेहमी बाबासाहेबांना बोलत असत , एकदा त्या खूप चिडल्या त्यावर बाबासाहेब म्हणाले
माझ्या नावाने सारखी ओरडत असतेस मग मी काय करावे असे तुला वाटते ?"
त्यावर रमाबाई उद्गारल्या , " अहो , घरात भाजीपाला , तेल मीठ , गहू, तांदूळ वगैरे वस्तू लागतात याकडे तरी नवऱ्याने थोडे लक्ष द्यावे . कधी मुलाबाळांना जवळ घ्यावे , त्यांना ओंजारावे -गोंजारावे , बायकोशी दोन शब्द प्रेमाने बोलावेत. परंतु तुमचे मात्र सर्वच मुलखावेगळे ! येऊन जाऊन तुमची ती जाडजूड पुस्तके , त्यांचे सतत वाचन आणि तुम्ही ! "
रमाबाईंच्या डोळ्यात अश्रू होते त्यांनी अनेक दिवसांची मनोव्यथा आपल्या पतीसमोर व्यक्त केली .तेव्हा खऱ्या परिस्थितीची जाणीव बाबासाहेबांना देखील झाली आणि त्या महामानवाचे डोळे पाणावले आणि ते आपल्या पत्नीला म्हणाले, " रामू ! तू अशी साध्वी आहेस ना म्हणूनच मी असा राहू शकतो !"
रमाबाईंनी आपल्या संसाराविषयक भ्रामक स्वप्नांचे मोहपाश झुगारून दिले तात्काळ त्या स्वाभिमानाने उद्गारल्या , ' साहेब ! आपणास आपल्या कोट्यावधी अस्पृश्य बांधवांचा , समाजाचा कल्याणाचा संसार करावयाचा आहे.
पत्नीचे हे उद्गार ऐकून बाबासाहेबांच्या उत्साहात पुन्हा जागृती आली .कर्तुत्वाला चालना मिळाली . ध्येयस्थानाची नवीन स्फूर्ती मिळाली . म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर माता रमाबाईंना
आपले स्फूर्तीस्थान मानत .रमाबाईंनी पतीच्या कष्टमय ध्येयवादी जिवनात प्रामाणिकपणे साथ दिली . त्यांच्या अंगीकृत कार्यात त्यांच्या मागे सावलीसारख्या खंबीरपणे सतत उभ्या राहिल्या .
अशा महान मातेस माझे कोटी कोटी प्रणाम .................
! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!
-----------------सविता राजेंद्र बाविस्कर --------------
Comments
Post a Comment